दूसऱ्या टी-20 सामन्यातही ऑस्ट्रेलियाचं लोटांगण
। तिरुअनंतपुरम। वृत्तसंस्था ।
तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 च्या पहिल्या सामन्यात मिळवलेली लय कायम ठेवली. दुसऱ्या सामन्यात भारताने 20 षटकात 4 विकेट गमावत 235 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ केवळ 191 धावा करू शकला आणि सामना गमावला. ऑस्ट्रेलियाचा 44 धावांनी पराभव करत पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. जो प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाच्या फलंदाजांनी चुकीचा सिद्ध केला. सलामीला आलेल्या ऋतुराज गायकवाड सोबत यशस्वी जैस्वालने पहिल्या विकेटसाठी 35 चेंडूत 77 धावांची भागीदारी केली. गेल्या सामन्यात लवकर आऊट झालेल्या यशस्वी जैस्वालने 212 च्या स्ट्राइक रेटने मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात षटकार चौकारचा पाऊस पडला. आणि ताबडतोड अर्धशतक (53) ठोकले, ज्यात 9 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता.
जैस्वालच्या विकेटनंतर असे वाटले की षटकार चौकार थांबतील, पण इशान किशन आणि गायकवाड यांनी ती लय कायम ठेवली. भारताची दुसरी विकेट ईशान किशनच्या रूपात पडली, जो 32 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 52 धावा करून बाद झाला. विकेट गमावण्यापूर्वी इशान किशनने ऋतुराज गायकवाडसह दुसऱ्या विकेटसाठी 87 धावांची (58 चेंडू) मजबूत भागीदारी केली. त्यानंतर 18व्या षटकात नॅथन एलिसचा बळी ठरलेल्या सूर्यकुमार यादवच्या रूपाने संघाला तिसरा धक्का बसला. सूर्याने 10 चेंडूत 2 षटकारांच्या मदतीने 19 धावांची खेळी केली. 20व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर नॅथन एलिसने उपकर्णधार गायकवाडला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. गायकवाडने 43 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 58 धावांची खेळी केली. तर रिंकू सिंगने 9 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 31 धावांची नाबाद खेळी केली आणि तिलक वर्मा 2 चेंडूत 1 षटकाराच्या मदतीने 7 धावांवर नाबाद राहिला.
ऑस्ट्रेलियनकडून ग्लेन मॅक्सवेलने 2 षटकात 38 धावा दिल्या. याशिवाय शॉन ॲबॉटने 3 षटकात 56 धावा दिल्या. ॲडम झाम्पाने 4 षटकांत 33 धावा आणि तनवीर संघाने 4 षटकांत 34 धावा दिल्या. दरम्यान, नॅथन एलिसने 3 बळी घेत संघासाठी यशस्वी गोलंदाज असल्याचे सिद्ध केले. यादरम्यान त्याने 4 षटकात 45 धावा दिल्या. तर मार्कस स्टॉइनिसला एक विकेट मिळाली.
ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात चांगली सुरुवात केली आणि दुसऱ्या षटकात संघाची धावसंख्या 30 धावांपर्यंत पोहोचली. मात्र, शॉर्ट 19 धावा करून बाद झाला आणि कांगारू संघ रुळावरून घसरला. त्यानंतर इंग्लिश 2, मॅक्सवेल 12 तर स्मिथही 19 धावा करून बाद झाला. स्टॉइनिस आणि डेव्हिडने अर्धशतकी भागीदारी करून संघात पुनरागमन केले, पण डेव्हिड बाद झाल्यानंतर भारताचा विजय जवळपास निश्चित झाला. डेव्हिडने 37 आणि स्टॉइनिसने 45 धावा केल्या. शेवटी मॅथ्यू वेडने नाबाद 42 धावा केल्या, पण ऑस्ट्रेलियन संघ नऊ गडी गमावून 191 धावाच करू शकला.
भारताकडून प्रसिद्ध कृष्णा आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. अर्शदीप सिंग, अक्षर पटेल आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.