| उरण | वार्ताहर |
मच्छि पकडण्याच्या जाळ्यात अडकलेल्या कासवाला करंजा कोंढरी पाडा येथील भारत पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी समुद्राच्या पाण्यात पुन्हा सोडून जीवनदान दिले आहे.
करंजा गावातील कोंढीपाडा येथील पाटील व त्यांचे सहकारी नेहमी प्रमाणे अरबी समुद्रात आपली बोट घेऊन मासेमारी करण्यासाठी गेले होते. त्यानी खोल समुद्रात मासेमारी करणारे जाळे टाकले असता, त्यांच्या जाळ्यात मंगळवारी (दि.26) समुद्रातील मोठे कासव अडकून पडले होते. हि बाब त्यांच्या सहकाऱ्यांच्या निदर्शनास आली असताना. त्यांनी जाळ्यात अडकले कासव बाहेर काढून त्या कासवांना पुन्हा समुद्रात सोडून दिल