। पनवेल । विशेष प्रतिनिधी ।
नळाद्वारे होणार्या अपुर्या पाणीपुरवठ्यामुळे करंजाडे वसाहतीमधील नागरिक त्रस्त आहेत. गुढीपाडवा नववर्षाच्या पहिल्या दिवशी करंजाडेवासियांच्या नळांमध्ये पिण्याचे पाणी आले नसल्याने त्यांनी पाणीपुरवठा करणार्या यंत्रणेबद्दल संताप व्यक्त केला.
करंजाडे वसाहतीमधील सेक्टर 4 मधील मेघना शिवम गृहनिर्माण संस्थेमध्ये मंगळवारी सायंकाळी वसाहतीमधील अनेक गृहनिर्माण संस्थांच्या पदधिकार्यांनी एकत्र येऊन नेमके काय करता येईल याविषयी बैठक घेतली. लाखो रुपये किमतीचे घर खरेदी केले. पिण्याचे पाणी मिळत नसल्याने लेखी पत्रव्यवहार, सिडको मंडळाच्या अधिकार्यांच्या भेटी आणि बेलापूर येथील सिडको भवनावर हंडा मोर्चा काढला. परंतु, अजूनही करंजाडेवासियांचे पाणी हाल संपलेले नाहीत.
सध्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मोटारपंपात काही दोष असल्याने मागील काही दिवसांपासून पाणीपुरवठा कमी होत असल्याचे सांगितल्याने पुन्हा करंजाडेवासीय आक्रमक झाले आहेत. करंजाडे नोड फ्लॅट ओनर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत गुजर यांनी मंगळवारच्या शिवम मेघना सोसायटीमध्ये झालेल्या बैठकीत कोट्यवधी रुपये केंद्र व राज्य सरकार रस्त्यांसाठी संपवत आहे. मात्र, पाणी ही जीवनावश्यक मूलभूत गरज असताना एमजेपीसारखी यंत्रणा मोटारपंप हे आप्तकालिन तातडीने का उपलब्ध ठेवत नाही, असा प्रश्न उपस्थित केला.