सेवासमाप्तीच्या कारवाईची दाट शक्यता
। मुंबई । वृत्तसंस्था ।
राज्य शासनात विलीनीकरण आणि शासकीय कर्मचार्यांप्रमाणे वेतन मिळण्याच्या मुद्यांवरून गेल्या 13 दिवसांपासून एस्टीचा संप करणार्या कर्मचार्यांवर निलंबनाची कारवाई करण्यास एसटी महामंडळाने सुरुवात केली आहे. मंगळवारी 376 कर्मचार्यांना निलंबित करण्यात आले. ही कारवाई आणखी वाढेल, अशी माहिती महामंडळाकडून देण्यात आली. निलंबन केलेल्या कर्मचार्यांवर आरोपपत्र दाखल करून सेवासमाप्तीची कारवाईही होऊ शकते. तर संपात सहभागी असलेल्या अन्य काही कर्मचार्यांचे वेतन रोखण्याचाही विचार महामंडळ करत आहे.
राज्यातील 45 आगारातील 376 कर्मचार्यांना मंगळवारी निलंबित करण्यात आले कामगारांना संपासाठी उद्युक्त करणार्यांचे निलंबन करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. राज्यातील ज्या आगारातून संपाची सुरुवात झाली, अशा आगारातील निलंबित कर्मचार्यांची संख्या अधिक असल्याचे सूत्रांनी सांगितले.