• Login
Friday, April 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय संपादकीय

तिसर्‍या आघाडीची मांडणी

Krushival by Krushival
December 3, 2021
in संपादकीय
0 0
0
गुन्हेगारांचे आश्रयस्थान
0
SHARES
100
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी बुधवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आणि या दोन दिग्गज नेत्यांच्या चर्चेत राष्ट्रीय स्तरावर सामूहिक नेतृत्व निर्माण करण्याची गरज कशी आहे, यावर चर्चा झाली. देशात 2024 च्या लोकसभा निवडणुकीवर देशातील परिस्थिती बदलण्यासाठीचा सगळा भर असून सत्तारूढ भारतीय जनता पक्षाच्या विरोधात विरोधी पक्षांना एकत्र करण्यासाठी बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेस आपला राष्ट्रीय ठसा उमटवत असून त्यादृष्टीनेही या बैठकीला महत्त्व आहे. शरद पवार यांनी ममता बॅनर्जी यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले की, त्यांच्या पक्ष सहकार्‍यांनी ममता बॅनर्जी यांच्याशी दीर्घ गप्पा आणि चर्चा झाल्या. त्यात आजच्या परिस्थितीत समविचारी शक्तींनी राष्ट्रीय पातळीवर एकत्र येऊन सामूहिक नेतृत्व कसे उभे करणे गरजेचे आहे, यावर त्यांनी भर दिला आणि त्यांच्या भेटीचा तोच हेतू होता असे त्यांनी स्पष्ट केले. ममता बॅनर्जी यांनी पश्‍चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्व प्रकारच्या डावपेचांना धूळ चारुन त्यांना पराभूत करुन पुन्हा सत्ता मिळवल्यानंतर त्यांचे स्थळ अधिक बळकट बनले आहे. राष्ट्रीय पातळीवर भाजपला टक्कर देण्याची त्यांची तयारी पाहून सगळे विरोधी पक्ष त्यांच्या भोवती उभे राहतील असे चित्र निर्माण झाले आहे. त्याचबरोबर त्या आपल्या पक्षाचा विस्तार करण्यासाठी दमदार पावले उचलत असून मेघालय राज्याचे माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा यांच्यासह 12 काँग्रेस आमदारांनी तृणमूलमध्ये पक्षांतर केले आहे. अन्य अनेक नेते अलिकडेच तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत. तसेच, गोव्यातील येत्या विधानसभेच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी तेथे आपल्या पक्षाला मजबूतपणे उतरण्यासाठी तयार केले आहे. त्यांनी प्रामुख्याने काँग्रेसमधील नेते फोडले आहेत. अर्थात गोव्यातील राजकारण पाहता तेथे कोण मूळ काँग्रेसचा आणि कोण मूळ भाजपचा हे सांगणे कठीण असते. तरी काही महिन्यांत तेथे एक महत्त्वाचा सत्तेसाठीचा स्पर्धक म्हणून पक्षाला उभे करण्याचे अवघड काम त्यांनी केले आहे. तिसरी आघाडी हा काही नवीन विचार नाही. गेल्या तीन दशकांतील राजकारण हे अशाच आघाड्यांचे होते हे आपण पाहिले आहेच. त्यात पंतप्रधानपदही प्राप्त झाले आहे. बिगर भाजप, बिगर काँग्रेस पक्षाचे पंतप्रधान झालेलेही देशाने पाहिले आहेत. आता या तिसर्‍या आघाडीत प्रश्‍न आहे तो काँग्रेसचा. ममता बॅनर्जी यांच्या मते यूपीए ही संयुक्त आघाडी आता अस्तित्वात नाही. त्यांनी राहुल गांधी यांच्यावरही टीका केली आहे. निम्मा काळ परदेशी घालवून इथले राजकारण करता येत नाही, असे त्यांचे मत आहे आणि त्यात तथ्य आहे. ममता स्वत: अशा प्रकारे रस्त्यावर उतरून खेला होबे करणार्‍या नेत्या आहेत. त्यामुळे त्यांचा याबाबतचा स्पष्टोक्तेपणा कायम पाहिला गेला आहे. शरद पवार यांची याविषयीची भूमिका थोडी वेगळी आहे. पवारांना पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा आहे आणि मराठी माणसाने देशाचे पंतप्रधानपद भूषवावे असे महाराष्ट्रातील जनतेलाही वाटते. तसे करण्याची क्षमता असलेले पवार हेच सध्यातरी एकमेव नेते आहेत आणि आता तशी संधीही या तिसर्‍या आघाडीतून दिसते. त्यांना वाटते की ज्यांना या भाजपविरोधी आघाडीत सहभागी व्हायचे आहे आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी आहे, अशा सर्वांना सोबत घेऊन काम करायला हवे. काँग्रेस या भाजपाविरुद्धच्या आघाडीचा भाग असेल का, असे विचारले असता पवार यांनी भाजपा विरोधात असलेला कोणताही पक्ष एकत्र आला तर त्याचे स्वागत आहे, असे उत्तर दिले आहे. बॅनर्जी यांच्या मते आधीच्या सरकारच्या वेळी स्थापन झालेली युपीए आता अस्तित्वात नसल्याने आपणच एक पर्यायी आघाडी उभी करायला हवी. काँग्रेसला आता आपल्याविना अडणार नाही हे लक्षात घेऊन कालानुरूप भूमिका घ्यायला हवी. कारण काँग्रेस नसेल तर ती आघाडी कमकुवत होऊ शकते आणि त्याचा फायदा भाजपालाच होऊ शकतो. ते टाळायला हवे. काँग्रेस कायम नेतृत्वाच्या स्थानी राहिली, त्यामुळे त्याला आपले स्थान ढळमळताना दिसत आहे. मात्र सगळ्या गोष्टी काळाच्या ओघापुढे बदलतात, हे त्यांनी पाहायला हवे आणि या आघाडीत सर्व शक्तीनिशी उतरायला हवे. तिसरी आघाडी हा सध्या तरी सक्षम पर्याय आहे.

Related

Tags: Editorialmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Previous Post

40 वर्षांवरील सर्वांना बूस्टर डोस द्या; शास्त्रज्ञांनी केंद्राकडे केली शिफारस

Next Post

साहित्य संमेलन : कौतुकाचा सोहळा

Krushival

Krushival

Related Posts

रस्त्यावरील गतिरोधकांना पांढऱ्या पट्टयाची गरज
अलिबाग

रस्त्यावरील गतिरोधकांना पांढऱ्या पट्टयाची गरज

February 14, 2024
गुन्हेगारांचे आश्रयस्थान
संपादकीय

रात्र थोडी सोंगे फार

January 14, 2024
गुन्हेगारांचे आश्रयस्थान
संपादकीय

 रामाच्या नावाने 

January 12, 2024
गुन्हेगारांचे आश्रयस्थान
संपादकीय

निकालाचे राजकारण

January 11, 2024
गुन्हेगारांचे आश्रयस्थान
संपादकीय

मुंबईला तिसरा डबा  

January 10, 2024
गुन्हेगारांचे आश्रयस्थान
संपादकीय

भारतीय नावांचे कायदे 

January 10, 2024
Next Post
साहित्य संमेलन : कौतुकाचा सोहळा

साहित्य संमेलन : कौतुकाचा सोहळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?