• Login
Friday, February 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

मित्र आणि शत्रू

Varsha Mehata by Varsha Mehata
June 18, 2021
in संपादकीय
0 0
0
मित्र आणि शत्रू
0
SHARES
54
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

बुधवारी शिवसेनेचे मुख्यालय असलेल्या दादर भागात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले आणि त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. गेली काही दशके भाजप आणि शिवसेना यांचे राजकारण पाहत असलेल्या अनेकांना हे दृश्य अभूतपूर्व वाटले आणि हे दोन पक्ष सत्तासंघर्षात पुढच्या कोणत्या पातळीपर्यंत जातील असाही प्रश्‍न लोकांच्या मनात उपस्थित झाला. या संघर्षाला निमित्त झाले ते शिवसेनेचे मुखपत्र सामना दैनिकातील अग्रलेखाचे. अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी जमीन खरेदीत गैरव्यवहार झाले आणि अवघ्या आठ मिनिटात दोन कोटींची जमीन साडेअठरा कोटी रुपयांना राम मंदिर उभारणार्‍या ट्रस्टने विकत घेतली असा नुकताच आरोप झाला आहे. त्या संदर्भात सामनाने याप्रकरणाची खुलासेवार चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी केली. त्याला आक्षेप घेऊन हा रामाचा अवमान आहे आणि तो सहन केला जाणार नाही, असे म्हणून त्याच्या विरोधात मोर्चा काढायचे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठरवले. गेली काही दशके कधीही न तुटणार्‍या आघाडीतील हे दोन महत्त्वाचे पक्ष हिंदुत्वाच्या प्रश्‍नावर एकत्रित आले होते आणि ते कधीही वेगळे होणार नाहीत असे यांची आघाडी 1989 मध्ये झाली तेव्हापासून मानले जात होते. अगदी अलिकडेपर्यंत ती सुरू होती. गेल्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सहाय्याने शिवसेनेने मुख्यमंत्रीपद मिळवले आणि भाजपाला बाजूला ठेवले. त्याआधी 2014 च्या निवडणुकीत भाजप शिवसेनेचे सरकार राज्यात असले तरी त्यांनी निवडणूक स्वतंत्रपणे लढवली होती. या काळातही त्यांच्यातील संघर्ष काही लपून राहिलेला नव्हता. सत्तेत असून विरोधी पक्षाची वर्तवणूक शिवसेनेने कायम ठेवली होती आणि त्याचे परिणाम पुढच्या निवडणुकीत युती तुटण्यात झाले. यात सर्वांत मोठा भाजपा बाजूला राहिला आणि कधी नव्हे अशी अभूतपूर्व आघाडी महाराष्ट्राने पाहिली. या पार्श्‍वभूमीला अजून काही तपशील जोडले तर या दोन पक्षांतील संघर्ष अधिक स्पष्ट होऊ शकतो. तो आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून सुषमा स्वराज यांचे नाव पुढे केले होते आणि त्यावेळी नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असू शकतील अशी कुजबूज सुरू झाली होती. त्यानंतर भाजपाला बहुमत मिळून राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार सत्तेवर आले त्यावेळी शिवसेनेला एकच जागा देऊ केल्याने संघर्ष घडला होता. नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने टीका करणे हे धोरण शिवसेनेने कायम राबवले. आता जो संघर्ष सुरू आहे त्याला राम मंदिरातील कथित घोटाळ्याचे निमित्त असले तरी ते देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीचे कारण आहे. मात्र या निवडणुकीत आत्ता जे दृश्य दिसले त्यापेक्षा अत्यंत वेगळे दृश्य दिसू शकते. शिवसेना-भाजप हे एकत्रित येऊन ही निवडणूक लढवू शकतात. कारण शिवसेनेला मुंबई महापालिकेवरची सत्ता कोणत्याही परिस्थितीत जाऊ द्यायची नाही व कोणत्याही परिस्थितीत ती टिकवायची आहे. त्यासाठी ते गरज भासल्यास भाजपशी युती करू शकतात. परंतु त्याआधी मागच्या सत्तेपासून दूर ठेवण्याचा शिवसेनेने केलेल्या प्रकाराचे उट्टे काढण्यासाठी एकमेकांवर दबाव टाकण्यासाठी हे तंत्र वापरले जात आहे. शिवसेनेने आपला मतदार टिकवला मात्र शिवसेनेची धोरणे प्रादेशिक अस्मितेची आहेत. भाजपा राष्ट्रीय पक्ष असल्याने त्याला ती अडचणीची ठरतात. त्याच्यामुळेही युती असतानाच्या काळातही या दोन पक्षांमधील तणाव कायम राहिला आणि वाढला देखील. म्हणून येत्या फेब्रुवारीमध्ये होणार असलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कोणती युती आकार घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. कारण मुंबई महापालिकेवर शिवसेनेचे दीर्घकाळ नियंत्रण आहे आणि त्याचबरोबर मुंबईतील अनेक पायाभूत सुविधांबद्दल लोकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे ही सत्ता टिकवणे शिवसेनेला सोपे जाणार नाही. फक्त त्यासाठी शिवसेना कुठल्या पातळीवर जाऊन तडजोड करायला तयार होईल हे पाहायला हवे. त्याचबरोबर मुंबईत झालेला लोकसंख्यात्मक बदल लक्षात घेता तेथे प्रादेशिक अस्मितेऐवजी भाजपाचा सर्व प्रादेशिकता एकत्र आणण्याचे धोरण अधिक परिणामकारक ठरू शकते. मात्र त्यासाठी कशी आखणी होते यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. म्हणूनच या निवडणुकीत हे दोन पक्ष एकत्रित आले तर आश्‍चर्य वाटायला नको. आता त्याच्यामध्ये मोठा भाऊ कोण हे ठरविण्यासाठी हा सध्याचा संघर्ष सुरू आहे.

Related

Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित

Next Post

मराठा आरक्षण; लक्ष्य कुठे अन् कुठे इशारा!!!

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

दरडग्रस्तांच्या दुर्दैवाची कहाणी – भाग 1
पोलादपूर

दरडग्रस्तांच्या दुर्दैवाची कहाणी – भाग 1

July 25, 2025
Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले
sliderhome

Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले

April 2, 2025
वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील
sliderhome

वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील

March 18, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
रायगड

जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ

March 8, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
रायगड

जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ

March 8, 2025
अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका
रायगड

अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका

March 8, 2025
Next Post
मराठा आरक्षण; लक्ष्य कुठे अन् कुठे इशारा!!!

मराठा आरक्षण; लक्ष्य कुठे अन् कुठे इशारा!!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?