। मुंबई । वृत्तसंस्था ।
मुख्यमंत्र्यांनी ‘आमदारांना घर देऊ’ असे विधान केले. तर, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी विधानसभेत मुंबईत आमदारांसाठी कायमस्वरूपी घरे देण्यात येतील, अशी घोषणा केली होती. त्यामुळे, सर्वसामान्यांकडून नाराजी जाहीर केली जात आहे. या सर्व गदारोळानंतर आता सरकारने सारवासारवीची भूमिका घेतली असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातल्या एका कार्यक्रमात बोलत असताना ज्यांना मुंबईत घर नाही अशांना घर मिळेल असं मुख्यमंत्री म्हणाले होते आणि कुणालाही घर मिळणार नाही असेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे.