। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रार्थनामंदिरांवरील अनधिकृत भोग्यांविरोधात आता रायगड जिल्ह्यात देखील कारवाई करण्यासंदर्भात मनसेने जिल्हा पोलिस अधिक्षकांना निवेदन देत 3 मे 2022 पर्यंत असे भोंगे कायमस्वरूपी काढून टाकण्याची मागणी केली आहे.
याबाबत देण्यात आलेल्या निवेदना म्हटले आहे की, देशात प्रत्येकाला आपापला धर्म व प्रार्थनेचे स्वातंत्र्य असले तरी त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी होऊ नये अशी सर्वांची माफक अपेक्षा आहे. मुंबई उच्च न्यायालय, कलकत्ता उच्च न्यायालय, कर्नाटक उच्च न्यायालय यांच्या विविध न्यायनिर्णयाच्या आधारे अनधिकृत भागे काढून टाकण्याबद्दल आदेश देण्यात आले आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा ओंग्यांच्या आवाजाची मर्यादा व वेळा निश्चित करून देण्यात आल्या आहेत. तरीही एका विशिष्ट समुदायाकडून वारंवार या कायद्याचे उल्लंघन केले जाते व पोलीस प्रशासनास नेहमी गृहीत धरले जात आहे.
राज ठाकरे यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे हा प्रश्न धार्मिक नसून पूर्णपणे सामाजिक स्वरूपाचा आहे. तेव्हा सर्वधर्मीय सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कासाठी समाजहितासाठी या भोंग्यांचा त्रास कायमस्वरुपी बंद करणेसाठी पोलीस प्रशासनाने कठोर अंमलबजावणी करुन या सर्व अनधिकृत भोंग्यांवर त्वरित कारवाई करावी असे नमुद करण्यात आले आहे.