। रसायनी । वार्ताहर ।
गेल्या 15 वर्षापासून रसायनी प्रकल्पग्रस्त शेतकर्यांचे एचओसीएलबाबत प्रश्न प्रलंबित असल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोषाचे वातावरण दिसून येत आहे. गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करावी अशी रसायनी प्रकल्पग्रस्त शेतकर्याची मागणी कायम आहे. मात्र अद्याप काहीही निर्णय न झाल्यामुळे रसायनी प्रकल्पग्रस्त शेतकरी दि. 23 जूनला विभागीय कोकण आयुक्त यांच्या बेलापूर कार्यालयावर लाँगमार्च तसेच 24 जूनपासून बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे.