आजाराची लक्षणे जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन
। सुकेळी । वार्ताहर ।
सद्यपरिस्थितीत वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत असल्याचे दिसून येत आहे. मागिल काही दिवसांमध्ये वातावरणात कधी ऊन तर कधी पाऊस अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अशा या वातावरणामुळे नागरिकांच्या आजारपणात मोठी वाढ झाली आहे.
वातावरणात सध्या वेगळीच परिस्थिती निर्माण झाल्यामुळे कधी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो तर कधी ऊन ! त्यामुळे या सारख्या बदलत्या वातावरणाचा फटका नागरिकांना बसत आहे. या बदलामुळे अनेक नागरिकांना ताप, सर्दी, खोकला, जुलाब अशा विविंध आजारांचा सामना करावा लागत आहे. या आजारपणांमुळे सध्या सर्वत्र उपचारासाठी दवाखान्यात मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तरी या बदलत्या वातावरणात आरोग्याची योग्य ती काळजी घेणे, पाणी उकळून प्यावे, तसेच आजाराची लक्षणे जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे असे आवाहन जिंदाल रुग्णालयातील डॉ.प्रशांत रायबोले यांनी केले आहे.