महाड | प्रतिनिधी |
महाड तालुक्यांतील खरवली गावांत राहात असलेली महिला आल्या दोन मुलांसह घरातून कोणालाही न सांगता निघून गेली आहे, या महिलेच्या पतीने तिचा सर्वत्र शोध घेतला परंतु तीचा ठावठिकाणा लागला नाही.अखेर पतीने महाड एमआयडीसी पोलिस ठाण्यामध्ये आपल्या दोन मुलांना आणि पत्नीला अज्ञात इसमाने अपहरण केले असल्याची तक्रार केली आहे.
खरवली गावांमध्ये विनोद हिरालाल राम मुळ रा. बिहार हा तरुण आपली पत्नी आणि दोन मुलांसह राहात होता. शुक्रवार दि.16 रोजी त्याची पत्नी सौ लिलादेवी वय 23,व दोन अल्पवयीन मुले अभिषेक वय 3 आणि अनतोल वय् 2 यांच्यासह घरांतून निघून गेली,कामावरुन घरी आलेल्या विनोद याला आपली पत्नी आणि दोन मुले घरांत नसल्याचे आढळून आल्या नंतर त्याने सर्वत्र शोध घेतला परंतु कांहीच माहिती मिळू शकली नाही.अखेर त्याने अज्ञात इसमाने आपल्या पत्नीला फूस लाऊन पळवून नेल्याची तक्रार केली आहे.पोलिसांनी अज्ञात इसमाच्या विरोधांत भादवी कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन अधिक तपास आर.व्ही.भोसले करीत आहेंत.