। पेण। वार्ताहर ।
संस्कारक्षम पिढी घडण्याच्या काळातच अनेक युवती लव्ह जिहादफच्या जाळ्यात अलगदपणे अडकतात. भूलथापांना बळी पडून स्वतःचे पूर्ण कुटुंब उध्वस्त होत असून या अदृश्य लव्ह जिहाद विरोधी लढ्यासाठी आता सज्ज व्हा असे आवाहन जेष्ठ पत्रकार आनंद जाधव यांनी केले. पेणमध्ये पेण एज्युकेशन सोसायटी आणि अहिल्या महिला मंडळ येथे दै. मुंबई तरुण भारत चे माझे शहर लव्ह जिहादमुक्त शहरफ या अभियान सभेचे आयोजन करण्यात आले होते. या दोन्ही ठिकाणी सभेला अभुतपूर्व प्रतिसाद लाभला. यावेळी दै मुंबई तरुण भारतचे प्रतिनिधी आनंद जाधव व उपसंपादिका योगिता साळवी या प्रमुख वक्ता होत्या.
उपसंपादिका योगिता साळवी यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.यावेेळी संस्थेचे मानद सचिव बाळासाहेब जोशी, रायगड वैश्यवाणी समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र झिंजे, प्राचार्य अंजली जोशी, डॉ. जगदीश केसकर, गोरक्षक मंगला पाटील, उदय मानकवळे, विद्या साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र शिक्षण संस्थेच्या सार्वजनिक विद्यामंदिर येथे शिक्षकांशी योगिता साळवी यांनी संवाद साधला. यावेळी मुख्याध्यापक मनोज नाना पाटील यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते. अहिल्या महिला मंडळ येथेही लव्ह जिहाद विरोधी कायद्याचा उहापोह केला. अश्विनी गाडगीळ यांनी प्रास्ताविक केले.