| बोर्लीपंचतन | वार्ताहर |
श्रीवर्धन-दिघी या मार्गाचं नव्याने करण्यात येत असलेलं डांबरीकरण नुकतंच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पूर्ण झालं असून, वाहनांच्या वेगावर मर्यादा राहण्यासाठी ठराविक अंतरावर गतिरोधक बसवले आहेत. पण, या गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारले नसल्याने ते वाहनचालकांच्या नजरेस येत नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. याबाबत संबंधित विभागाने तात्काळ कार्यवाही करुन तात्काळ सर्व गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारावेत, अशी मागणी वाहनचालक व नागरिकांकडून होत आहे.