52 वर्षांच्या मैत्रीचे सत्तराव्या वर्षी स्नेहसंमेलन

| म्हसळा | वार्ताहर |

महाड येथील वि.ह. परांजपे हायस्कूलच्या 1971 च्या म्हणजे 11 वीच्या एसएससी बॅचचे स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले. 52 वर्ष वयोमान असलेल्या या सत्तरीच्या आजोबा मित्रांचे स्नेहसंमलेन सलग दुसर्‍या वर्षी लाडवली येथील सुधाकर मांडवकर यांच्या हॉटेल अंगणमध्ये तब्बल दोन दिवस पार पडले.

दोन दिवस चाललेल्या या कार्यक्रमांत फक्त सकारात्मक चर्चा ह्या मुख्य हेतूने चर्चात्मक मजा लुटली. एकमेकांनी आपली छोटी-छोटी सकारात्मक गुपिते ज्यांना-ज्यांना आठवणीत येतील, त्यांनी नाट्यमय सादर करायची, असे आवाहन विजय उर्फ बाळू देशपांडे यांनी केले. त्याला सर्वांनी दाद देत ग्रुपमध्ये प्रथमच सामील झालेले बाळू देशपांडे, नितीन दोसी यांनी आणि नंतर नंदा शेठ, सुधीर गंद्रे, दीपक कोटिया, संजय खांबेटे, नंदू मेहता, शेखर वाडकर, विनायक खोडके, अविनाश टक्के, सुशील कडू, संतोष वारगे, प्रदीप गांधी, मोहन पाटेकर, सुधीर जाधव, माधव उर्फ पप्पू मुंदडा, दीपक देसाई, निरंजन गुप्ते, शिरीष वारंगे आदींनी भावनात्मक प्रसंग सांगत आपापली मैत्री घट्ट केली.

Exit mobile version