राजकीय साठमारीत नको ते मंत्रिपद

बच्चू कडूंचा संताप

| मुंबई | प्रतिनिधी |

राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीचा कंटाळा आल्याचे सांगत अपक्ष आ.बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळात समावेश न होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, दरम्यान, यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवरील आपली नाराजी बोलून दाखवली. एकंदरीत सत्ता, पैसा आणि पुन्हा सत्ता या बदलत्या राजकारणाचा आम्हाला कंटाळा आला आहे. सगळं काही पदासाठी नसतं. काही लोक म्हणतात की तुम्हाला आता पद मिळणार नाही वगैरे. मी त्याची पर्वा करत नाही. आमची भूमिका ठाम आहे. आम्ही इथून पुढे दिव्यांगांसाठी, शहीद परिवारांसाठी काम करणार आहे, अशी भूमिका बच्चू कडूंनी यावेळी मांडली.

मी आज मंत्रीपदाचा दावा सोडण्याचा निर्णय घेणार होतो. पण गेल्या मुख्यमंत्री अर्ध्या तासापासून खूप फोन करत आहेत. त्यांनी मला त्यांची भेट घेतल्यानंतर निर्णय घेण्यासंदर्भात विनंती केली आहे. त्यामुळे मी त्यांची विनंती म्हणून दावा सोडण्याचा निर्णय 18 तारखेपर्यंत पुढे ढकलला आहे. त्यांनी 17 तारखेला भेटण्यासाठी विनंती केली आहे. त्यानंतर 18 तारखेला तुम्हाला हवा तो निर्णय घ्या असं ते म्हणाले आहेत. त्यानुसार मी 18 तारखेला माझा निर्णय जाहीर करेन, असं बच्चू कडू यांनी यावेळी स्पष्ट केलं.

तर गुवाहाटीला जायची वेळ आली नसती
यावेळी बोलताना बच्चू कडूंनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करताना घडलेल्या घडामोडी सांगितल्या. मागच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरेंकडे आम्ही दोन आमदार गेलो. त्यांनी आमच्याकडे स्वत: फोन करून पाठिंबा मागितला. त्यावेळी आम्ही पाठिंबा दिला. त्यानंतर बऱ्याचदा इतर पक्षांकडून आम्हाला आमिषं आली. पण आम्ही आमच्या पाठिंब्यावर ठाम राहिलो. तसेच, उद्धव ठाकरेही दिलेल्या शब्दावर ठाम राहिले आणि मी राज्यमंत्री झालो, असं ते म्हणाले.पण त्यानंतर राज्यात नवीन सत्तासमीकरणं जुळायला लागली. आम्ही उद्धव ठाकरेंना दिव्यांग मंत्रालयासाठी भेटत होतो. तेव्हा दिव्यांग मंत्रालय झालं असतं, तर गुवाहाटीला जायची वेळ आली नसती. पण एकनाथ शिंदेंनी दिव्यांग मंत्रालय तयार केलं. माझ्यासाठी ही आयुष्यातली सर्वात मोठी घटना आहे. मी गुवाहाटीला जाण्यामुळे या देशातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय अस्तित्वात आलं. त्यासाठी मी वैयक्तिक पातळीवर आयुष्यभर एकनाथ शिंदेंचे आभार मानत राहीन, असंही बच्चू कडू यावेळी म्हणाले.

आपण सामान्यांसाठी आहोत, सामान्यांसाठी राहायला पाहिजे. काही चुका आमच्या हातून झाल्या असतील. पण त्या दुरुस्त करण्याची काळजी आम्ही करायला पाहिजे. मला दिव्यांगांसाठी, मतदारसंघासाठी वेळ द्यायचा आहे. त्यामुळे मंत्रीपद घेतलं तर तो वेळ देता येणार नाही. मी आज निर्णय घेणार होतो. पण मुख्यमंत्र्यांनी मला विनंती केली की आज कुठला निर्णय घेऊ नका. पण मी माझ्या निर्णयावर ठाम राहीन.

बच्चू कडू,आमदार
Exit mobile version