। मुंबई । प्रतिनिधी ।
रोहा तालुक्यातील न्हावेे पुलाच्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, ही बाब आ. जयंत पाटील यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यावेळी दोन-तीन वर्षांत पुलाच्या रस्त्याची दुरुस्ती पूर्ण करण्याचे आश्वासन ग्रामविकास मंत्र्यांकडून देण्यात आले होते. मात्र, आजमितीस रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे आ. जयंत पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारला धारेवर धरले.
आ. जयंत पाटील यांनी न्हावे रस्त्याचे काय काम केले, काय कारवाई केली? याबाबत ग्रामविकास मंत्र्यांना विचारणा केली. तसेच हा रस्ता यावर्षी चालू होईल का? त्याबाबत अधिवेशनात घोषणा करणार का? असे प्रश्न ग्रामविकास मंत्र्यांसमोर उपस्थित केले. त्यावर चर्चा करु असे सांगणार्या मंत्र्यांना चर्चा नको, काम हवे, असे आ. जयंत पाटील यांनी ठणकावून सांगितले. अखेर मंत्र्यांनी नमते घेत या पुलाचे काम तातडीने करण्याचे आश्वासन दिले. आ. जयंत पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे न्हावे पुलाचा रस्ता लवकरच होणार असून, ग्रामस्थांनी आ. जयंत पाटील यांचे आभार मानले.