वायू दलातील मिराजला अपघात

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारतीय वायू दलातील मिराज -2000 या लढाऊ विमानाचा मध्यप्रदेश राज्यात अपघात झाला आहे. या अपघाताच्या चौकशीचे तात्काळ आदेश देण्यात आले आहेत.
हाती आलेल्या बातमीनुसार, ग्वाल्हेर इथल्या वायू दलाच्या तळावरुन नियमित सरावाच्या निमित्ताने उड्डाण केल्यावर काही मिनिटातच तांत्रिक बिघाड झाल्याचे मिराजच्या पायलटच्या लक्षात आले. इजेक्शन सीटच्या सहाय्याने पायलट विमानाच्या बाहेर आला आणि मग पॅराशूटच्या सहाय्याने जमिनीवर सुखरूप उतरला.
मिराज -2000 हे लढाऊ विमानांच्या प्रकारातील चौथ्या श्रेणीतले लढाऊ विमान असून भारतीय वायू दलातील एक महत्त्वाचे लढाऊ विमान समजले जाते. पाकिस्तानमध्ये बालाकोट इथे केलेल्या हवाई हल्ल्यात याचा वापर करण्यात आला होता.

Exit mobile version