। मुंबई । वृत्तसंस्था ।
पालघरच्या चारोटी येथे टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आणि उद्योगपती सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. पालघर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी सव्वा तीन वाजेच्या दरम्यान अहमदाबाद- मुंबई रस्त्यावर सूर्या नदीच्या पुलावर हा अपघात झाला. या अपघातात इतर दोन लोक दगावल्याचे पोलिसांनी सांगितले तर इतर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हा अपघात मर्सिडीज गाडी डिव्हायडर धडकल्याने झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
मिस्त्री हे वयाच्या 43 व्या वर्षी 2013 साली टाटा समुहाचे अध्यक्ष बनले होते, त्यानंतर 2016 साली झालेल्या वादानंतर मिस्त्रींना अध्यक्षपदावरुन हटवण्यात आले होते.