दिल्लीत पाशवी बहुमताचे सरकार नको
| मुंबई | प्रतिनिधी |
देशात या पुढे एका बहुमताचे पाशवी सरकार नको. मिली-जुली सरकार आले पाहीजे. यासाठी मोदी सरकार सत्तेवरुन खाली खेचलेच पाहीजे, असा हल्ला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केला.
शिवसेनेचा दसरा मेळावा मंगळवारी शिवाजी पार्कमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने शिवसैनिक विचारांचे सोने लुटण्यासाठी दाखल झाले होते.
2014 साली आम्ही वेड्या सारखा मोदींना पाठींबा दिला होता. मात्र आता मोदी सरकार हटवलच पाहीजे. देशात मिली-जुली सरकार आले पाहीजे. उद्या आपले सरकार येणार आहे, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. हिटलर देखील खुप माजला होता. आज जर्मन लोकांना हिटरलरची लाट वाटते, असे सांगत ठाकरे यांनी मोदींची तुलना हिटलरशी केली, मात्र त्यांनी मोदींचे नाव न घेतले नाही. कुटुंब व्यवस्था आपली संस्कृती आहे. जी कुटुंब व्यवस्था मानत नाहीत, त्यांनी आम्हाला घराणेशाही शिकवू नये, असा इशारा त्यांनी दिला. मणिपुरला जाऊन हनुमान चालीसा म्हणून दाखवा असे, आव्हान त्यांनी मोदी यांना दिले.
मुंबईला दुसऱ्या मार्गाने तोडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. महापालिके एैवजी आता नीती आयोग मुंबईचा विकास करणार का, असा सवाल करत मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा कोणी प्रयत्न केला, तर त्याचे आम्ही तुकडे करु असा हल्लाबोल ठाकरे यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी सुरत लुटली होती, मात्र येथील लाचार हे सुरतला पळाले, अशी टीका त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे नाव न घेता केली. मुंबई महापालिकेची चौकशी करणार असाल, तर पीएम केअर फंडाची आणि काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वांचीच चौकशी करा, असे आव्हान त्यांनी सरकारला दिले. आरेच्या जमीनीवर मेट्रो उभारण्यात येत आहे. मात्र या मेट्रोचा सर्वसामान्यांना काहीच उपयोग होणार नाही. गद्दारांना गुजरातला पळण्यासाठी हि व्यवस्था करत असल्याचे ते म्हणाले. रावणाची लंका दहन केली तशी तुमच्या खोक्यांची लंका दहन करण्यासाठीचा धगधगता निखारा माझ्याकडे आहे, असा घणाघात त्यांनी शिंदेंवर केला.
आमच्या लोकांना विनाकारण दमदाट्याकरुन त्रास देत असाल, तर तुम्हालाही उलटे टांगू असा इशारा ठाकरे यांनी दिला.
आमदार अपात्रतेबाबतचे वेळापत्रक कधीही द्या. आमचा सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे. लवाद सर्वोच्च न्यायालयाला जुमानत नसेल, तर देशात लोकशाही राहणार आहे का, अशी अप्रत्यक्ष टीका विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्यावर केली. मी मुख्यमंत्री असताना कधी कुणावर लाठीमारचा आदेश दिला होता का? वरून आलेल्या आदेशानंतरच पोलिसांनी लाठीमार केला. हा आदेश देणार डायर कोण होता, असा सवाल त्यांनी केला.
गद्दारांमध्ये हिम्मत असेल, तर हा आरक्षणाचा प्रश्न सोडवा. पोट कोणत्याही जातीचे असो ते भरायलाचा पाहीजे. हे राज्यकर्त्यांचे काम असते. हा आरक्षणाचा विषय सोडवायचा असेल, तर संसदेत सुटेल. न्यायालयाचा निर्णय बदलायचा अधिकार संसदेला असतो. मनोज जरांगे-पाटील यांनी शांततेत आंदोलन केल्यामुळे यांचे ठाकरे यांनी विशेष अभिनंदन केले.
उद्योजक गौतम अदानी हे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मित्र आहेत. मुंबईतील धारावी झोपडपट्टीच्या पुर्नविकासाचे कंत्राट अदानीला दिले आहे. परंतु त्याला स्थानिकांचा विरोध आहे. शिवसेना स्थानिकांच्या बाजूने ठामपणे उभी राहून हे होऊ देणार नाही, असा विश्वास ठाकरे यांनी दिला.