| खोपोली | प्रतिनिधी |
खोपोली नगरपालिकेच्या हाद्दीत मोठी लोकवस्ती वाढल्यामुळे नगरपालिकेच्या माध्यमातून मूलभूत सुविधा शेवटच्या घटकांपर्यत पोहचविण्यासाठी तसेच नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अनुप दुरे यांनी प्रशासन आपल्या दारी अभियानास सुरू केले आहे. मीळ गावातून अभियनास प्रारंभ करण्यात आला. मुख्याधिकारी दुरे दररोज दोन तास प्रत्येक प्रभागातील वाडी वस्त्यांवर आपल्या अधिकाऱ्यांसवेत जाऊन नागरिक समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
शहरात विविध शैक्षणिक संस्था, आरोग्य व्यवस्था व बाजारपेठ असल्यामुळे तालुक्यातील खेड्यातील मोठ्या प्रमाणावर कुटूंबे शहरात वास्तव्य करतात. तसेच, शहराचा भौगोलिक विचार केल्यास आज डोंगरमाथ्यावर आदिवासी बांधव राहत आहेत. त्यांच्यापर्यत मूलभूत नागरी सुविधा पोहचविण्यासाठी कोणत्या आडचणी येतात. स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी नगरपालिकेचे मुख्याधिकारी, प्रशासक अनुप दुरे यांनी प्रशासन आपल्या दारी अभियानास सुरू केले आहे. यावेळी मीळ गावातील स्मशानभूमी, रस्ते,पथदिवे आदी समस्या पाढा ग्रामस्थांनी मुख्याधिकाऱ्यांपुढे वाचला. त्यांनी तातडीने सर्व समस्या मार्गी लावण्याचे आदेश संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांंना दिले.
बुधवार दि.18 रोजी प्रभाग क्र. 1 मधील साईबाबा नगर, सुभाष नगर, तांबडी येथे मुख्याधिकाऱ्यांनी भेट दिली. याप्रसंगी नगरअभियंता अनिल वाणी, प्रविण भोये, बांधकाम विभागाचे सतिष हाडप, आरोग्य विभागाचे अतुल घोड, भरत सोलंकी, मंगेश काळोखे, दत्ता नाईक, संतोष नाईक उपस्थित होते. याठिकाणीची नगरपालिकेच्या शाळेची दुरावस्था, गटारे, फुथपाथ, पथदिवे याबाबतच्या समस्या नागरिकांनी उपस्थित केल्या. त्या समस्या त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी समस्या सोडविण्यासाठीचे आदेश दिले.
ज्या ठिकाणी नगरपालिकेच्या सुविधा पोहचविण्यासाठी अडचणी येतात तसेच सर्वसामान्य नागरिकांना पालिकेच्या कार्यालयात समस्या मांडण्यासाठी येण्यास खर्चिक असते. याची जाणीव ठेवत अधिकाऱ्यांची टिम सोबत घेऊन प्रशासन आपल्या दारी मोहिम सुरू केली आहे.
अनुप दुरे पाटील, मुख्याधिकारी तथा प्रशासक, खोपोली नगरपरिषद