बारावीच्या केमिस्ट्री पेपरनंतर गणिताचा पेपरही फुटला

विद्यार्थ्यांच्या फोनमध्ये आढळली प्रश्नपत्रिका
। मुंबई । वृत्तसंस्था ।
मुंबईत महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा केमिस्ट्रीचा पेपर फुटल्यानंतर आता गणिताचा पेपरही फुटला आहे. गणिताचा पेपर सुरु होण्याआधी श्रीगोंद्यातील विद्यार्थ्यांना सुमारे पाऊण तास उत्तरासहित प्रश्नपत्रिका मोबाईलच्या व्हॉट्सअप वर आल्याने एकच खळबळ उडाली. याबाबत गट शिक्षण विभागाने मोबाईलवर आलेली प्रश्नपत्रिका व परीक्षेची प्रश्नपत्रिका एकच असल्याचा दुजोरा दिला आहे. काही विद्यार्थ्यांच्या फोनमध्ये प्रश्नपत्रिका आढळली त्याचबरोबर केमिस्ट्रीचा पेपर फुटल्याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी मालाड येथील एका खासगी कोचिंग क्लासच्या शिक्षकाला अटक केली आहे.

Exit mobile version