। नागोठणे । वार्ताहर ।
येथील सर्व समाज बांधव एकोप्याने नांदतात, एकमेकांच्या सणांमध्ये सहभागी होतात हा नागोठण्याचा इतिहास आहे. त्यामुळे कुणातरी एखाद्या व्यक्तीच्या सोशल मिडीयावरील चुकीच्या पोस्टमुळे सर्वांची माने कलुषित होतात. त्यामुळे कोणताही वादग्रस्त प्रकार लक्षात येताच पोलिसांना कळवा, कायदा हातात घेऊ नका तसेच धार्मिक तेढ निर्माण होईल अशी कोणतीही गोष्ट करू नका अशा महत्वपूर्ण सूचना नागोठण्याचे पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांनी शांतता समितीच्या बैठकीत दिल्या. आषाढी एकादशी, बकरी ईद व गुरुपौर्णिमा या सणांच्या पार्श्वभूमीवर नागोठणे पोलीस ठाण्यात मंगळवारी(दि.5) सायंकाळी संपन्न झालेल्या या बैठकीला राष्ट्रवादीचे विभागीय नेते भाई टके, विलास चौलकर, मोहन नागोठणेकर, बिलाल कुरेशी, अशपाक पानसरे, संतोष गायकवाड, सद्दाम दाफेदार, मंगेश तेरडे, ज्ञानेश्वर साळुंखे, धनंजय जगताप, चेतन कामथे, अकबर पठाण, प्रमोद जांबेकर, पप्पू अधिकारी, दिनेश घाग, मुजफ्फर कडवेकर, हुसेन पठाण, दानिश अधिकारी, हे.कॉ. विनोद पाटील आदींसह सर्वपक्षीय कार्यकर्ते, पत्रकार व नागरिक उपस्थित होते. आभारप्रदर्शन पो.हे.कॉ. विनोद पाटील यांनी केले.