विद्युत पुरवठा खंडीत असतांना ग्राहकांना भरमसाठ बिल; मनसे आक्रमक
निवेदनाद्वारे १० दिवसात वीज बिल कमी करून देण्याची मागणी
I महाड I प्रतिनिधी I
२२ जुलै रोजी महाड शहर आणि तालुक्यात आलेल्या महाप्रलयात व्यापारी नागरिक ग्रामस्थ पुरते उध्वस्त झाले आसतानाच आता महावितरणनी ग्राहकांना भरमसाट विजबिल अदा करत आणखी एक झटका दिला आहे.
दरम्यान प्रलयकारी महापुरात झालेल्या प्रंचड नुकसानीला एक महिना होवून गेला नसताना शासनाकडून अद्याप म्हणावी तशी मदत केली नाही. त्याच बरोबर सुरुवातीच्या तीन आठवड्यात शहरांत आणि ग्रामिण भागात विजपुरवठा खंडीत असतानाही महावितरणकडून ग्राहकांना भरमसाठ विजबिले अदा केल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली असतांना स्थानिक महाड मनसे महावितरण विरोधात उभी ठाकली आहे.
मंगळवारी मनसे दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष चेतन उतेकर यांनी उपकार्यकारी अभियंता चंद्रकांत केंद्रे यांना महाड कार्यालयात एक निवेदन दिले यावेळी त्यांच्या समवेत बंटी पाटील, दिपक चव्हाण, चंद्रहास नगरकर, विशाल मेस्त्री, पंकज उमासरे, हर्षल नाईक, दादा उतेकर आदी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
पुराच्या पाण्यामध्ये संपूर्ण महाड शहर बुडाले असल्याने महाडकरांना साफ सफाईला अनेक दिवस उलटून गेले असून आजही काही दुकानातील साफ सफाई सुरू आहे. सर्व तळमजल्या वरील दुकाने पाण्याखाली असल्याने दुकानांची संपूर्ण साफ सफाई होई पर्यंत जवळ पास २० दिवस कोणीही आपल्या दुकांना मध्ये वीज पुरवठा सुरू करू शकला नाही. याचे कारण पूर्ण भिजलेली वायरिंग. अश्या परस्थित वीज पुरवठा सुरू केला गेला असतातर काही ही अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.
पुरामध्ये नुकसान झालेल्या ट्रान्सफारमर्सची दुरुस्ती करून वीज सुरू करण्यात आली .मात्र भिजलेले मीटर काही दिवसातच बदलण्याचे काम सुरू केले जाणार आहे. या पुरामध्ये महावितरणचे जवळपास तीन करोडचे नुकसान झाले असल्याचे महावितरण कडून सांगण्यात येत आहे. या नुकसानीची वसुली ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिल देऊन त्यांच्या कडून वसूल केला जात असल्याचे दिसून येत आहे.
मनसेनी आपल्या निवेदनात महापूरा नंतर १५ दिवस विद्युत पुरवठा खंडीत असताना ग्राहकांना सदर वीज बिले सरासरी आणि जाचक असून पुरामध्ये पुरता उध्वस्त झालेल्या ग्राहकाला ती न परवडणारी अशीच असून एक महिन्याच बिल माफ करण्यात यावीत जेणे करून ग्राहकांना दिलासा मिळू शकेल अस म्हटल आहे.
इतर मागण्या – :
१ ) सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून सर्व वीजबिल माफ़च केले गेले पाहिजे .
२) वीजबिल माफी नसेल होत तर महावितरण ने ग्राहकांचा घरी जाऊन सुधारित बिल द्यावे.
३) पाण्यामुळे जी काही मीटर खराब झाली असतील ती तातडीने विनामूल्य बदलून दिली गेली पाहिजेत !
४) वीजबिल भरलं नाही म्हणून वीजपुरवठा खंडित करू नये.