। मुंबई । वृत्तसंस्था ।
सध्या अनेक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जात आहेत. आधी वेंदाता, मग बालक ड्रग पार्क आणि आता टाटा एअर बसचा प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यांनतर आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाणार असल्याची माहिती आहे. सॅफ्रन ग्रुपचा प्रकल्प आता हैदराबादला जाणार असल्याची माहिती आहे. नागपूरच्या मिहानमधील हा प्रकल्प आहे.
महाराष्ट्रातून हा प्रकल्प हैदराबादला गेला आहे. जमीन मिळण्यास दिरंगाई झाल्यामुळे हा प्रकल्प बाहेर गेला आहे. 1 हजार 115 कोटींची प्राथमिक गुंतवणूक असणारा हा पकल्प हैदराबादला गेला. विमान आणि रॉकेट यांचं इंजिन बनवणारी ही कंपनी होती.
या प्रकल्पाच्या जाण्यामुळे राज्यातील जवळजवळ 500 ते 600 कामगारांचा रोजगार बुडाला आहे. सॅफ्रन कंपनी नागपूरच्या मिहानमध्ये विमान इंजनाच्या देखभाल दुरुस्तीच युनिट बनवणार होती.
सॅफ्रन ग्रुपचे सीईओ संबंधित अधिकाऱ्यांना भेटले. परंतू जागा न मिळाल्याने हा प्रकल्प हैदराबादला जात आहे. सॅफ्रन ग्रुपचे सीईओ केंद्रीय संरक्षण मंत्र्यांना भेटले आणि जागे अभावी हा प्रकल्प हैदराबादला जात असल्याचं सांगितलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
तसेच महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता देखील आहे. त्यामुळं सॅफ्रन कंपनीनं आपला प्रकल्प अखेर हैदराबादला हलवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, याबाबत अद्याप राज्य सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.