पदाधिकारी आणि सदस्यांची कारवाई
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील भालिवडी ग्रुप ग्रामपंचायत मधील अधिकारी यांच्याकडून मनमानी सुरू असल्याने त्यांची बदली करण्यात यावी, अशी मागणी सरपंच आणि सर्व सदस्यांनी केली आहे. मात्र पंचायत समिती कडून त्याबाबत कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर ग्रामपंचायत मधील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांनी सर्वांनी एकत्र येत भालीवडी ग्रुप ग्रामपंचायतीला ठोकले टाळे ठोकले आहे.
भालिवडी ग्रुप ग्राम पंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी कदम यांच्याविरोधात सरपंच आणि सदस्य आक्रमक झाले आहेत. त्यांचे निलंबन करण्याची मागणी सरपंच दीपक कार्ले यांनी केली आहे. तसे निवेदन सरपंच यांच्याकडून गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे यांना देण्यात आले आहे. सरपंच दीपक कार्ले यांनी आपल्या ग्रामपंचायत मधील नियुक्तीवर असलेल्या ग्रामविकास अधिकारी राजश्री कदम यांच्याविरोधात यापूर्वी केलेल्या तक्रारीवर कर्जत पंचायत समिती कडून कोणतीही झालेली नव्हती. त्यामुळे ग्रामपंचायत मधील सर्व कर्मचारी यांनी एकत्र येत ग्रामपंचायत कार्यालयाला टाळ ठोकले.
25 जानेवारीला ग्रामसेविका राजश्री कदम यांनी ग्रामपंचायत कार्यालयात आपल्या हातावर इजा करून घेतली. कार्यालयात सरकारी ठिकाणी त्यांनी वैयक्तिक कारणावरून स्वतःला इजा करून घेतली असून याबाबत लगेचच सरपंच कार्ले यांनी कर्जत पंचायत समिती मधील विस्तार अधिकारी कळवले होते. दुसर्या दिवशी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला ध्वजारोहण कार्यक्रमाला ग्रामविकास अधिकारी या अनुपस्थित होत्या. त्यामुळे आम्हाला ग्रामसेवक बदलून मिळत नाही तो पर्यंत आम्ही सर्व सदस्य आणि पदाधिकारी यांनी ग्रामपंचायत कार्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला कोणतेही कारण न देता अनुपस्थित राहणार्या कर्मचार्यावर कर्जत समितीने निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी सरपंच कार्ले यांनी केली आहे. त्या निवेदनावर सरपंच दीपक कार्ले, उपसरपंच समिर ठाकरे आणि सदस्य राजेश शेळके, गुरुनाथ मुकणे, आशा कर्णुक, नंदिनी माळी, प्रमिला कटके, मंजुळा पवार, कमल हिलम या सात सदस्य यांच्या सह्या आहेत. ते निवेदन गटविकास अधिकारी यांना देण्यात आल्यानंतर भालिवडी ग्रुप ग्रामपंचायत मधील सर्व लोकप्रतिनिधी यांनी एकत्र येत फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालयात टाळे ठोकले.