पालकमंत्री होण्याला फारसे महत्व नको, आदिती तटकरे

| अलिबाग | प्रतिनिधी |

रायगडचे पालकमंत्री कोकणातीलच आहेत. पालकमंत्री म्हणून ते दोन्ही जिल्ह्याचे काम सांभाळत आहेत. जिल्ह्यात एक पालकमंत्री असताना मी पालकमंत्री होणे या गोष्टीला फारसे महत्व द्यायला नको, असे म्हणून महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी या वादावर तात्पुरता पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. अलिबागमध्ये एका कार्यक्रमाच्या दरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.
जिल्ह्यात पालकमंत्रि पद कोणाकडे आहे, यापेक्षा आम्ही सर्वजण सत्तेत आहोत.

रायगड जिल्ह्याला याचा जास्तीत जास्त कसा फायदा होईल यासाठी प्रयत्न करत आहोत. पदापेक्षा जनतेची कामे कशी मार्गी लावता येतील याला जास्त महत्व असल्याचे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले. उदय सामंत हे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून चांगले काम करत आहेत, अशी प्रशस्तीही त्यांनी केली.

Exit mobile version