मोठी बातमी! राज्यातील पाच मोठी शहरे नक्षलींच्या टार्गेटवर

| नागपूर | प्रतिनिधी |

राज्यात नक्षली चळवळ सक्रीय होत आहे. राज्यातील मोठ्या शहरांमध्ये हिंसाचार घडवण्याचा प्लॅन नक्षलवाद्यांनी आखला आहे. येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंसाचार घडवून आणण्यासाठी नक्षली सक्रीय झाले आहेत. शहरी नक्षलवाद्यांना समर्थन करणाऱ्या 54 संघटना पोलीसांच्या रडारवर आल्या आहेत, अशी माहिती नक्षली विरोधी अभियानाचे महासंचालक संदीप पाटील यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्रातील पाच शहरांत शहरी नक्षलवाद्यांचा हिंसक प्लॅन आहे. शहरी नक्षलवादी हिंसक आंदोलने करणार आहेत. हिंसक आंदोलन करुन सरकार विरोधात असंतोष निर्माण करण्याचा नक्षलवाद्यांचा प्रयत्न असल्याची गोपनीय माहिती पोलीसांना मिळाली असल्याचे संदीप पाटील यांनी सांगितले.

ही पाच शहरे रडारवर
नक्षलवाद्यांनी राज्यातील पाच प्रमुख शहरांवर लक्ष केंद्रीत केले आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, गोंदिया ही शहरे नक्षलवाद्यांच्या टार्गेटवर आहे. समाजात असंतोष निर्माण करण्याचा आणि हिंसक आंदोलनाचा शहरी नक्षलवाद्यांचा प्रयत्न आहे. यामुळे शहरी नक्षलवाद्यांना समर्थक करणाऱ्या 54 संघटना पोलीसांच्या रडारवर आहेत. त्यांचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत.
झोपडपट्टीतील मुलांचा समावेश
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरी नक्षलवादी काही शहरात हिंसक आंदोलने करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. सीपीआय मॉवोइस्ट या प्रतिबंध असलेल्या संघटनेची युनायटेड फ्रंट शहरांमध्ये हिंसक आंदोलने घडवणार आहेत. विविध संघटनांच्या माध्यमातून शासनाविरुद्ध रोष निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पुण्यातील झोपडपट्टीतील काही मुले नक्षल चळवळीसाठी जंगलात पाठवली जात आहे. पुण्यात एटीएसच्या ताब्यात असलेला संतोष सेलार याला नक्षलवाद्यांनी जंगलात पाठवलं होते. तसंच शहरी नक्षलवादी तरुणांची भरती करुन जंगलात पाठवत आहेत.
Exit mobile version