। पाताळगंगा । वार्ताहर ।
दिवसेंदिवस वातावरणात उष्णता मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने, जलाशय आपली पाठ फिरवली जात आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य मोठ्या प्रमाणात जाणवू लागले आहे. यामुळे घोटभर पाण्यासाठी मुक्या पक्ष्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. हे दृश्य तालुक्याच्या ठीकाणी पहावयास मिळत आहे.
निसर्गराजाच्या लहरीपणामुळे सर्वांनाच बेजार करुन सोडले आहे. कधी सुर्यनारायणाची तळपती उष्णता तर कधी वरुणाची दमदार हजेरी वृक्षांचे जंगले नष्ट करुन त्याजागी सिमेंटची जंगले निर्माण करीत आहेत.यामुळे मानवानी केलेल्या निसर्गावर जुलमी हाहाकारामुळे अन् मानवाच्या स्वार्थी प्रहारामुळे पक्ष्यांचा किलबिलाट अन् चिवचिवाट हरवत चालला आहे. यामुळे भविष्यात चित्राच्या आणी व्हिडिओ द्वारे बालकांना पक्ष्यांची ओळख करुन घ्यावी लागते की काय? अशी स्थिती निर्माण होत चालली आहे.
पुर्वी पहाटेच्या वेळी अंगणातला एखाद्या वृक्षावरुन पक्ष्यांचा ऐकू येणारा किलबिलाट कानाला वर पडताच मनाला समाधान मिळत असे.सकाळच्या प्रहरी अशी सुखद निसर्गनिर्मित देखाव्यामुळे दिवस अगदी प्रसन्न वातावरणात जात होता. मात्र या एकविसाव्या वैज्ञानिक युगात सारं काही दुर्मिळ होत आहे. कारण विज्ञानाच्या जोरावर मानवाने असाध्य गोष्टी साध्य केल्या. या कारणासाठी त्याला निसर्गावर ’कुर्हाड’ चालवली यामुळे साहजिकच पक्ष्यांचे कुटुंबे उध्वस्त झाली. मानवाने शायनिंग मारण्यासाठी ’च्युईंगम’ पक्षासाठी भाताचा कणच वाटला असावा म्हणून आशेने चोच मारावी आणी त्यांचा घात व्हावा,शिवाय पाण्याविना भटकंती करण्यासाठी पक्ष्यांची सर्वत्र ठीकाणी तळमळ सुरु झाली आहे. यामुळे पक्षी प्रेमी आणी नागरीकांनी पक्षासाठी पाणपोई उभारणे गरजेचे आहे.