। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबागमध्ये घडलेल्या दोन बालकांच्या हत्येप्रकरणी अलिबाग पोलिसांनी मयत प्रियांका आणि कुणाल यांच्यावर भादंवि ३०२,३२ अन्वये हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. प्रियांका आणि कुणाल हे दोन लहान मुलांसह अलिबाग येथे पर्यटनासाठी आले होते. ते येथील ब्लॉसम कॉटेज, चावडी मोहल्ला ता. अलिबाग येथे वास्तव्यास होते. ते मुळचे शिक्रापूर येथून पळून आलेले होते. हे सर्व हरविल्याची फिर्यादही शिक्रापूर पोलीस ठाण्यात नोंदविली होती. हे दोघे पळून गेल्याने गावात बोभाटा झाला. प्रियकर आरोपीत असे ते पळुन आल्याने गावामध्ये बोभाटा झाल्याचे व दोघांच्या पोलीस ठाण्यात हरविल्याच्या तक्रारी झाल्याची माहीती मिळाल्याने बदनामीमुळे भविष्यात पुढे काय करायचे या वैफल्यातून या दोघांनी आपल्या सोबत आणलेल्या मुलगी भक्ती आणि मुलगा माऊली या दोन्ही लहान मुलांना विष पाजून त्यांना जीवे मारले. त्यानंतर या दोघांनी गळफासाने आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने अलिबाग पोलिसांनी मयत प्रियांका आणि कुणाल यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा नोंदविला. अधिक तपास पोनि / सणस हे करीत आहेत.