| वावोशी | वार्ताहर |
खालापूर तालुक्यातील साजगाव ते आडोशी मुख्य रस्त्यावरील चिंचवली गावाजवळील पूल मोडकळीस आला आहे. या पुलाचे नूतनीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे उत्तर रायगड जिल्हा सचिव वैभव केदारी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.
यावेळी त्यांच्या समवेत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विकी भालेराव, खालापूर तालुका अध्यक्ष प्रविण भालेराव, खालापूर तालुका संघटक प्रशांत गायकवाड, ऋतिक गायकवाड, खालापूर तालुका आय.टी. प्रमुख संकेत केदारी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.