• Login
Wednesday, December 31, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

शरीफ सरकारपुढील आव्हानं

Varsha Mehata by Varsha Mehata
April 17, 2022
in संपादकीय, संपादकीय लेख
0 0
0
शरीफ सरकारपुढील आव्हानं
0
SHARES
20
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

 प्रा. विजयकुमार पोटे

पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांचं सरकार जाऊन शाहबाज शरीफ यांचं अंतर्विरोध असलेल्या विरोधी पक्षाचं सरकार आलं. इम्रान यांच्या पक्षाने आमदार, खासदारकीचे राजीनामे देऊन रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. सत्तेत येताना भारतविरोधी भूमिका आणि नंतर जुळवून घेण्याचा प्रयत्न असा प्रकार पाकिस्तानमध्ये यापूर्वीही घडला असल्याने शरीफ यांची ताजी भारतविरोधी भूमिका किती काळ कायम राहते, हे आता पहायचं.

पाकिस्तानमधला राजकीय अस्थिरतेचा कालखंड भलेही संपला असेल; पण नव्या सरकारसमोर अनेक मोठी आव्हानं उभी राहिली आहेत. पाकिस्तानमधल्या संयुक्त विरोधी पक्षाने इम्रान सरकारला सत्तेवरून पायउतार होण्यास भाग पाडलं. शेवटच्या चेंडूपर्यंत खेळण्याची तयारी असल्याचं सांगणार्‍या इम्रान यांनी संसदेला सामोरं जाण्याचं धाडसही दाखवलं नाही. उलट, सत्तेतून पायउतार झाल्यानंतर त्यांनी संसदेत सरकारची कोंडी करण्याऐवजी रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेतली. नॅशनल असेंब्लीमध्ये नंबर गेममध्ये इम्रान खान मागे पडले आहेत. अशा स्थितीत इम्रान यांना सत्तेवरून हटवल्यानंतर विरोधकांची एकजूट कायम राहणार का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. भिन्न विचार असलेल्या राजकीय पक्षांच्या ऐक्याचा आधार काय असेल, नवीन सरकारचं भविष्य काय असेल, नवं सरकार देशाच्या आर्थिक आघाडीवर कसं नियंत्रण ठेवेल, सत्ता मिळाल्यावर ही आघाडी लोकांच्या अपेक्षा कशी पूर्ण करणार या प्रश्‍नांच्या उत्तरांसाठी काही काळ थांबावं लागेल. पाकिस्तानच्या सरकारमधल्या स्थैर्याला लष्कर हा ही मोठा घटक जबाबदार आहे. पाकिस्तानमधल्या विरोधी एकजुटीने इम्रान यांच्या सरकारला सत्तेवरून हटवण्यात यश आलं आहे, यात शंका नाही. आता ही एकजूट दीर्घकाळ टिकणार का, हा प्रश्‍न आहे. भिन्न विचार असलेल्या संयुक्त आघाडीत एकता टिकवणं फार कठीण आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर जबाबदार्‍यांवरून हा वाद निर्माण होऊ शकतो. येथून संघर्ष सुरू होऊ शकतो. सरकारच्या कामकाजाबाबत विविध पक्षांमध्ये मतभेद होतील.
संयुक्त विरोधी पक्षात वेगवेगळ्या विचारसरणीच्या राजकीय पक्षांचा समावेश आहे. यावरून अनेक राजकीय पक्षांमध्ये अनेक दिवसांपासून मतभेद आहेत. इम्रान यांना हटवण्यासाठी सर्वजण एकत्र आले असले तरी ते किती काळ एकत्र काम करण्याच्या स्थितीत राहतील, हा मोठा प्रश्‍न आहे. संयुक्त आघाडीत काही कट्टरपंथी राजकीय पक्षांचाही समावेश आहे. शाहबाज शरीफ त्यांच्याशी कसा समन्वय साधतात हा महत्त्वाचा प्रश्‍न असेल. पाकिस्तानची आर्थिक स्थिती सध्या चांगली नाही. सरकार राजकीय पक्षांच्या ताळमेळात अडकत राहिलं तर देशाचे ज्वलंत प्रश्‍न तसेच राहतील. संसदीय व्यवस्थेत देशहिताचा कोणताही कठोर निर्णय घेण्यात आघाडी सरकार कमकुवत असल्याचं अनेकदा दिसून आलं आहे. पाकिस्तानमधली राजकीय स्थितीही काहीशी अशीच आहे. आर्थिक संकटाचा सामना करणार्‍या पाकिस्तानमध्ये कठोर निर्णय घेण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत शाहबाज शरीफ यांचं सरकार त्या दबावातून मुक्त होऊन निर्णय घेऊ शकणार का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. इम्रान यांनी घेतलेला संसद बरखास्त करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयामुळे उधळला गेला असला तरी नव्या सरकारला अवघ्या दीड वर्षांचा काळ मिळणार आहे. नवीन सरकारला सुमारे दीड वर्षानंतर आपल्या कामाचा तपशील जनतेला द्यावा लागणार आहे. पाकिस्तानचं नवं सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करू शकेल का? तोपर्यंत विरोधी पक्षांची एकजूट कायम राहणार का? या प्रश्‍नांची उत्तरं या पक्षांच्या परस्परसंबंधांवर अवलंबून आहेत. हे ऐक्य दीड वर्षं टिकलं तरी पाकिस्तानी जनतेचा विश्‍वास प्राप्त करता येतो का, हा खरा प्रश्‍न आहे.
नेपाळ आणि श्रीलंकेप्रमाणेच पाकिस्तानचीही आर्थिक स्थिती सध्या बिकट आहे. आर्थिक दु:स्थिती आणि अतिरेक्यांचा बंदोबस्त ही पाकिस्तान सरकारसाठी मोठी आव्हानं असतील. पाकिस्तानी लष्कराच्या नव्या सरकारच्या कारवायांवर बारीक नजर ठेवली जाईल. त्यामुळे लष्कराशी समन्वय साधणंही त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. अन्यथा, लष्कर कधीही सत्तापालट करू शकतं. पाकिस्तानमध्ये लष्करासाठी सध्याचं वातावरण अतिशय अनुकूल आहे. नव्या पंतप्रधानांसमोर देशाची अंतर्गत आणि बाह्य आव्हानं आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानच्या नव्या सरकारचे भारताशी संबंध कसे असतील, असा प्रश्‍न उपस्थित होतो. यासोबतच रशिया-युक्रेन युद्धादरम्यान नवं सरकार अमेरिका आणि रशियासोबतचे संबंध कसे सांभाळते हे पाहणंही रंजक ठरणार आहे. आर्थिक आघाडीवरही त्यांच्यासमोर मोठं आव्हान आहे. आर्थिकदृष्ट्या हतबल झालेल्या पाकिस्तानचं पुनरुज्जीवन करण्यासाठी त्यांच्याकडे कोणता रोडमॅप आहे, हे उमगलेलं नाही. पाकिस्तानमध्ये कोणाचीही सत्ता असो, दोन्ही देशांशी असलेल्या संबंधांमध्ये कोणताही फरक पडत नाही. पाकिस्तानमध्ये परराष्ट्र संबंधात सरकारी हस्तक्षेप कमी आणि लष्करी प्रभाव जास्त आहे. विशेषत: भारत-पाकिस्तान संबंधांबाबतचे निर्णय लष्करच घेतं. भारतासोबत चांगले संबंध हवे आहेत; पण काश्मीर प्रश्‍न सोडवल्याशिवाय ते शक्य नाही, हे विधान शाहबाज शरीफ यांना भारताशी संबंध सुधारायचे आहेत की लष्कराची मर्जी सांभाळायची आहे, याबाबतचा गोंधळ दाखवणारं आहे.
पाकिस्तान राजकीय आणि आर्थिक अशा दोन्ही आघाड्यांवर संघर्ष करत आहे. त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांचं लक्ष वेधण्यासाठी सरकार भारताचा मुद्दा पुढे करू शकतं. काश्मीरचा मुद्दा त्यासाठीच पुढे आणला असावा, असा अंदाज आहे. पाकिस्तान सरकार आणि लष्कर देशाच्या अंतर्गत समस्यांपासून सामान्य जनतेचं लक्ष विचलीत करण्यासाठी अशा कारवाया करत असल्याचं अनेकदा दिसून आलं आहे. सध्या नवीन सरकारसमोर मोठी आव्हानं आहेत. अशा स्थितीत नवं सरकार प्रथम अंतर्गत आव्हानांना सामोरं जाईल, अशी अपेक्षा आहे. जून 2018 मध्ये पाकिस्तानला ‘ग्रे लिस्ट’मध्ये टाकण्यात आलं आहे. ऑक्टोबर 2018, 2019, 2020, एप्रिल आणि ऑक्टोबर 2021 मध्ये झालेल्या आढाव्यातही पाकिस्तानला या बाबतीत कोणताही दिलासा मिळालेला नाही. त्यामुळेच सरकारही अतिरेकी संघटनांच्या पाठिंब्यावर मोठ्या तडफेने कारवाई करेल. नवीन सरकारला जून 2022 मध्ये पुन्हा एकदा ‘एफएटीएफ’ चा सामना करावा लागणार आहे. नव्या सरकारसमोर देशातल्या प्रभावशाली दहशतवादी संघटनांचा दबाव असेल तर दुसरीकडे ‘एफएटीएफ’च्या ‘ग्रे लिस्ट’मधून बाहेर पडण्याचं आव्हान असेल. परराष्ट्र आघाडीवर नव्या पंतप्रधानांसमोर मोठं आव्हान असेल. पाकिस्तानी लष्कर अमेरिकेशी सामान्य संबंधांचं समर्थन करत आहे. तिला अमेरिकेशी आपले संबंध सामान्य करायचे आहेत तर इम्रान सरकारचा कल रशियाकडे होता. आता नव्या सरकारची रणनीती काय असते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
अमेरिकेसोबतचे संबंध पुन्हा रुळावर आणण्यासाठी नव्या सरकारवर निश्‍चितच दबाव असेल. याशिवाय त्याला कोणत्याही परिस्थितीत चीन आणि रशियाला नाराज करणं परवडणार नाही. डझनभर बहुपक्षीय आघाड्यांमुळे आणि देशाच्या आर्थिक समस्यांमुळे शाहबाज काही महिन्यांनी काळजीवाहू सरकार सोपवून निवडणुकीला सामोरं जाऊ शकतात, असं तज्ज्ञांचं मत आहे. नॅशनल असेंब्लीचा कार्यकाळ पुढील ऑगस्टपर्यंत वैध आहे. युतीत बारा पक्ष असल्यानं नीट काम करू शकतील असं वाटत नाही. पाकिस्तानशी सामना करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांच्याशी बोलण्याऐवजी आंतरराष्ट्रीय समुदायाशी चर्चा करणं हा ‘मोदीमंत्र’. आज पाकिस्तान संपूर्ण जगात एकाकी पडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातले सर्वात शक्तिशाली व्यक्ती, म्हणजेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून गणल्या गेलेल्या जगातल्या नेत्यांशी बोलणारे पहिलेच. जम्मू-काश्मीरमधलं कलम 370 रद्द झाल्यापासून भारत आणि पाकिस्तानदरम्यान उच्च पातळीवर कोणतीही चर्चा झालेली नाही आणि सध्या पाकिस्तानमध्ये अनुभवायला मिळत असलेल्या राजकीय अस्थिरतेमुळे दोन्ही देशांमधली चर्चा आणखी कठीण होत चालली आहे.
शाहबाज शरीफ त्यांच्याकडून फारशा आशा नाहीत. काश्मीर प्रश्‍न आधी सोडवला तरच भारताशी चर्चा होऊ शकते, असं त्यांनी पंतप्रधान होण्यापूर्वीच सांगितल्यामुळे दोन्ही देशांमधल्या चर्चेतून हा प्रश्‍न कधी सुटणार हे सांगणं कठीण आहे. त्यामुळेच सध्या पाकिस्तानकडे दुर्लक्ष करण्याचं मोदींचं धोरण सर्वाधिक प्रभावी ठरत आहे.

Related

Tags: alibageditorial articlemarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

वाढता वाढता वाढे 

Next Post

अंगारकी संकष्टीसाठी गणपतीपुळे सज्ज

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

दरडग्रस्तांच्या दुर्दैवाची कहाणी – भाग 1
पोलादपूर

दरडग्रस्तांच्या दुर्दैवाची कहाणी – भाग 1

July 25, 2025
Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले
sliderhome

Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले

April 2, 2025
वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील
sliderhome

वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील

March 18, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
रायगड

जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ

March 8, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
रायगड

जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ

March 8, 2025
अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका
रायगड

अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका

March 8, 2025
Next Post
अंगारकी संकष्टीसाठी गणपतीपुळे सज्ज

अंगारकी संकष्टीसाठी गणपतीपुळे सज्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?