| रसायनी | वारर्ताह |
पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट रसायनी आणि पिल्लई एचओसी कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय मोहोपाडा रसायनी यांचा संयुक्त विद्यमानाने रविवार (दि.11) आलिबाग येथील वरसोली समुद्र किनाऱ्याची साफसफाई करण्यात आली. तसेच मोठ्या प्रमाणात प्लास्टिक बॉटल, कचरा गोळा करण्यात आला. साचलेला कचरा एकत्रित करुन त्याची योग्यप्रकारे विल्हेवाटही लावण्यात आली. त्यावेळी उपस्थित अरुण गोविंद जाधव अध्यक्ष पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट, अमित पाटील, निलेश जाधव, श्रीमती कळवती उपाध्याय शिक्षिका,यश खंडेलवाल,कृष्णा मिश्रा हर्ष पाटील,सुयश तांबडे , वैष्णवी खानविलकर आदी सोबत रसायनीतील राष्ट्रीय सेवा योजनांमधील असंख्य विद्यार्थी उपस्थित होते.