। तळा । प्रतिनिधी ।
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे साक्षीदार असणार्या गडकिल्ल्यांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. येणार्या पिढ्यांना महाराजांचा इतिहास कळावा यासाठी त्यांनी बांधलेल्या व जिंकलेल्या गडकिल्ल्यांचे संगोपन होणे गरजेचे आहे. त्याच अनुषंगाने तळा शहरातील ऐतिहासिक तळगड किल्ल्यावर दुर्गरत्न प्रतिष्ठान तर्फे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
राज्यातील गड किल्ल्यांचे संवर्धन व्हावे यासाठी दुर्गरत्न प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संघटनेतर्फे गडकिल्ल्यांवर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तळा शहरातील ऐतिहासिक तळगड किल्ल्यावर दुर्गरत्न प्रतिष्ठान तर्फे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी तळगडावर जाण्यासाठी असलेल्या वाटेवरील वाढलेली झाडी, वेली व दगड बाजूला सारून वाट मोकळी करण्यात आली. तळगडावर असलेल्या हौदांची तसेच गडावर सभोवताली वाढलेले गवत कापून गड परिसराची स्वच्छता करण्यात आली. या मोहिमे प्रसंगी दुर्गरत्न प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य तळा विभागातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.