| रसायनी | वार्ताहर |
भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाची योजना जन शिक्षण संस्थान रायगड महाराष्ट्र यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात कौशल्य विकासातील अनोखा उपक्रम 12 ऑक्टोबर रोजी मुख्य कार्यालय सहाण-अलिबाग या ठिकाणी कौशल्य दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमा प्रसंगी जन शिक्षण संस्थान योजना राष्ट्र उन्नतीला प्रेरक असे मत संस्थेचे अध्यक्ष डॉ. नितीन गांधी यांनी व्यक्त केले तर कार्यक्रमाचे संचलन संचालक डॉ. विजय कोकणे यांनी केले.
यावेळी कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला.कार्यक्रमप्रसंगी अध्यक्ष डॉ. नितीन गांधी, गीतांजली ओक, नरेन जाधव, भरत तन्नाजी, डॉ. विजय कोकणे, प्रतीक्षा चव्हाण, कल्पना म्हात्रे, वेदांती पाटील, रिद्धी पाटील, प्रांजली पाटील, अजय पाटील, दीपंकर राउळ, नवनाथ पोईलकर व भारती पोईलकर उपस्थित होते. आभारप्रदर्शन प्रतीक्षा चव्हाण यांनी केले.