मुंबई | वृत्तसंस्था |
जगभरात खळबळ उडवून दिलेल्या पनामा पेपर्स लीकप्रकरणी ईडीने अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला समन्स बजावले आहे. त्यानंतर ऐश्वर्या ईडीच्या कार्यालयात पोहोचली आहे. सध्या मुंबईत ईडी कार्यालयात मोठ्या हालचाली सुरू आहेत. दिल्लीहून ईडीची पथकं मुंबईत दाखल झाली आहेत. काही ठिकाणी छापेमारी झाल्याचं प्राथमिक वृत्त आहे.
तीन ते चार पथकं सकाळी सहाच्या सुमारास ईडी कार्यालयातून बाहेर पडली आहेत. मात्र कारवाई कुठे होणार आहे याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. ईडीने या प्रकरणी मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे, असं एएनआय या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. याआधीही ऐश्वर्या रायने दोन वेळा ईडीसमोर हजर राहण्यास असमर्थता व्यक्त केली होती.
ऐश्वर्या राय बच्चन विरोधात गुन्हा
![](https://krushival.in/grygrars/2021/12/aish.jpg)