मनसेकडून शेतकर्‍यांना खतांचे वाटप

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
सुधागड तालुका मनसेतर्फे नेहमीच सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविले जातात. मनसेतर्फे नुकतेच आसरे गावातील 40 शेतकर्‍यांना प्रत्येकी पाच किलो खताचे वाटप करण्यात आले आहे. राज ठाकरे यांच्या तब्येतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी शेतकर्‍यांचे आशीर्वाद राज ठाकरे यांना लाभावे याकरिता हा उपक्रम राबविण्यात आला. मनसे सुधागड तालुका उपाध्यक्ष संदीप मालुसरे यांच्या आर्थिक सहाय्याने हे खत वाटप कार्यक्रम करण्यात आले.

कोरोनामुळे शेतकरी बांधवांना आर्थिक व इतर अडचणींना सामोरे जावे लागले. त्यामुळे त्यांना सहकार्य व्हावे हा उद्देशदेखील या उपक्रमाचा होता. आगामी काळात आणखी 50 ते 60 शेतकरी बांधवांना खत वाटप करायचे आहे, असे संदीप मालुसरे यांनी सांगितले. या उपक्रमासाठी नवघर येथील मनसेचे विभाग अध्यक्ष शेखर चव्हाण, आसरे गावचे शाखा अध्यक्ष निखिल ठकोरे व मनसैनिकांचे सहकार्य लाभले. तसेच खत वाटप करण्याची संपूर्ण कल्पना रवींद्र कदम यांनी दिली. या उपक्रमाबद्दल शेतकर्‍यांनी मनसे पदाधिकार्‍यांचे आभार मानले.

Exit mobile version