। पाली । वार्ताहर ।
सुधागड मनसेतर्फे आसरे गावातील 40 शेतकर्यांना प्रत्येकी पाच किलो खताचे वाटप करण्यात आले. राज ठाकरे यांच्या तब्येतीत लवकर सुधारणा व्हावी, शेतकर्यांचे आशीर्वाद त्यांना लाभावे, यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. संदीप राम मालुसरे यांच्या आर्थिक सहाय्याने खत वाटप करण्यात आले. कोरोनामुळे शेतकर्यांना आर्थिक व इतर अडचणींना सामोरे जावे लागले. त्यामुळे त्यांना सहकार्य व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. आगामी काळात 50 ते 60 शेतकरी बांधवांना खत वाटप करायचे असल्याचे, मालुसरे यांनी सांगितले. या उपक्रमासाठी शेखर चव्हाण, निखिल ठकोरे व मनसैनिकांचे सहकार्य लाभले. तसेच खत वाटप करण्याची संपूर्ण कल्पना रवींद्र कदम यांनी दिली.