उड्डाणपूलावरून चालकांचा धुरळ्यामधून प्रवास

| उरण । वार्ताहर ।
जेएनपीटीला जोडणार्‍या न्हावा शेवा उड्डाणपूलाची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे या पुलावरील खड्ड्यांतील खडीमुळे मातीचा धुरळा झाला आहे. याचा त्रास या मार्गाने बंदरात ये जा करणार्‍या कामगार, कर्मचारी व बंदरावरील उद्योगात काम करणार्‍या तसेच उड्डाणपूलावरून प्रवास करणार्‍या वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. बंदरात बांधा वापरा व हस्तांतरित करा या तत्वावर सिंगापूर (बी.एम.सी.टी.) बंदर उभारण्यात आले आहे. चौथे बंदर म्हणून ही बंदराची ओळख आहे. या बंदराला जोडण्यासाठी न्हावा शेवा पोलीस ठाण्या जवळ उड्डाणपूल उभारण्यात आला आहे.

या पुलावरील डांबर या पूर्वीच उखडल्याने पुलावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे उड्डाणपूलावरून प्रवास करणे धोक्याचे बनले आहे. त्यातच पावसमुळें या खड्ड्यात वाढ झाली आहे. पुलावरून दररोज हजारो जड कंटनेर वाहने प्रवास करीत आहेत. त्यांच्या वजन व दाबामुळे पुलाच्या दुरुस्तीसाठी टाकण्यात आलेल्या खडीचे रूपांतर धुळीत होत आहे. पुलावरील सततच्या वाहतुकीमुळे येथील प्रवाशांना प्रचंड धुरळायुक्त मार्गावरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे येथील वाहनचालक व प्रवाशां कडून संताप व्यक्त केला जात आहे.

Exit mobile version