अवकाळीमुळे पुन्हा एकदा धास्तावले बागायतदार

। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
राज्यात सर्वकाळी अवकाळी अशी स्थिती आहे. त्यातच हवामान अंदाजाने वर्तविलेल्या अंदाजानुसार तळकोकणात अवकाळीचे आगमन झाल्याने बागायतदार पुन्हा एकदा धास्तावले आहेत.

या अवकाळीचे संकट आल्याने आंबा, काजू पीक धोक्यात गेलं आहे. आंबा पिकाला मोहोर बर्‍यापैकी आला असून काही ठिकाणी फळधारणा सुरू झाली आहे. अवकाळी पावसामुळे आंबा तसेच काजू मोहोर काळवडून खराब होण्याची दाट शक्यता आहे.

राज्यात आणि विशेष करून कोकणातही यावेळी थंडी जोरदार पडल्याने बागायतदार वर्ग आनंदित होता. पण अवकाळी पावसाने या आनंदावर विरजण घातलं आहे. समुद्रकिनारी असलेल्या भागात काजू आणि आंबा पीक धोक्यात आल्याने यावर्षीही नुकसानच अशी परिस्थिती आहे.

दरम्यान, आज सकाळी सुरू झालेला पाऊस सिंधुदुर्गच्या सहयाद्री पट्ट्यात पाऊस झाला. सावंतवाडी, कुडाळ, कणकवलीच्या काही भागात आज आणि उद्या दिवसभर ढगाळ आणि पावसाचे वातावरण असण्याची शक्यता आहे.

Exit mobile version