। खोपोली । प्रतिनिधी ।
खालापूर तालुक्याचा वाढता पसारा त्यामुळे अगोदरच येथील सार्वजनिक वाहतुकीवर नेहमी ताण असतो. परवडणार्या दरात प्रवास म्हणून मोठ्या संख्येने प्रवासी एसटी किंवा सिटी बसचा पर्याय निवडतात. परंतु एसटी संप आणि कोरोना संसर्गात बंद झालेली सिटी बस सेवा यामुळे प्रवाशांना रिक्षा किंवा ईकोचा पर्याय आहे. याचाच फायदा काही इको चालक आणि रिक्षाचालक घेत असून कमी अंतरासाठी देखील वेगवेगळे दर प्रवाशांकडून आकारले जात आहेत. प्रवासी बसवण्याची मर्यादा देखील कोरोना संसर्गात पाळली जात नसून इको मध्ये आठ ते दहा प्रवासी तर रिक्षामध्ये पाच प्रवासी भरून वाहतूक होत आहे.
मर्यादा पेक्षा जास्त प्रवासी भरून देखील काही ईको आणि रिक्षाचालक नेहमीच्या दरापेक्षा जास्त पैसे प्रवाशांकडून मागत असल्याच्या तक्रारी प्रवासी करत आहेत. खालापूर ते चौक काही चालक वीस रुपये असताना प्रवाशांकडून तीस रुपयाची मागणी करतात. रिक्षा चालक देखील अशाप्रकारे वाढीव पैसे मागत असल्याच्या तक्रारी प्रवासी करत आहेत. संप काळात आणि सणासुदीला
प्रवासी संख्येत वाढ झाल्यानंतर अशा प्रकारची लूट ठरलेली असून त्यावर अंकुश बसवण्यसाठी आरटीओ अधिकारी यांनी लक्ष मागणी प्रवासी करत आहेत.खालापूर ते चौक वीस रुपये असताना काही इको चालक तीस रुपये मागणी करतात. प्रवाशी देखील दाटीवाटीने भरले जात असल्याची माहिती भाग्यश्री शिंदे यांनी दिली.