| अलिबाग| प्रतिनिधी |
लायन्स क्लब मांडवाच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचे कौतुक आणि त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा यासाठी पीएनपी माध्यमिक शाळा, वायशेत येथे खास शिक्षकांसाठी निबंध लेखन स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेचा प्रारंभ लायन्स क्लब मांडवाचे अध्यक्ष अभिजीत गुरव यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले.
या स्पर्धेसाठी लायन्स क्लबचे अरविंद घरत, विद्या अधिकारी, नयन कवळे, जितेंद्र ठाकूर, प्रिती पाटील, सतीश म्हात्रे, अमिष शिरगावकर, मोहन पाटील, धवल राऊत, विजयराव देशमुख, सुमित पाटील, राजाराम हुलवान, चंद्रकांत मल्हार, अजय आंगणे, मोहिनी गुरव, जितेश्री ठाकूर, मृदुला राऊत, बी.एन, कोळी, प्रदीप पाटील, नीलम देशमुख, मीनल ठाकूर, उज्वला पाटील, गीता कुलपे, शीतल सिनकर, संजय पाटील, प्रदीप नाईक, महेंद्र पाटील, आशा बोराडे आदी मान्यवर उपस्थित होते.
संस्काराची विद्यापीठे हरवली कुठे?, उच्च शिक्षण : अपेक्षापूर्ती की अपेक्षाभंग, वर्तमान शिक्षण अपेक्षा आणि वास्तव, ऑनलाईन शिक्षण तारक की मारक?, खाजगी क्लासेस शिक्षकांचा अपमान असे पाच विषय निबंध लेखन स्पर्धेसाठी देण्यात आले होते. 24 शिक्षक-शिक्षिकांनी या निबंध स्पर्धेत सहभाग घेतला होता.