खोटे आश्वासन देणाऱ्या मोदींना हद्दपार करा: बी. व्ही. श्रीनिवास

| धाराशिव | प्रतिनिधी |

खोटे आश्वासन देऊन नागरिकांची दिशाभुल करत दहा वर्ष सत्तेत असलेल्या मोदी सरकारला या निवडणूकीतुन हद्दपार करा. भारतीय संविधान बदलण्याचे षडयंत्र आखले जात आहे. विकास कामांच्या नावाने बनवाबनवी करण्यात मोदी सरकार पटाईत आहे. देशात महागाईने कळस गाठल्याने सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. हे चित्र बदलायचे असल्यास इंडिया आघाडीला पवित्र मतदान करावे. सर्वसामान्यांचे प्रश्न संसदेत मांडण्यासाठी कर्तत्वतत्पर असलेले खासदार ओमराजे निंबाळकर यांना पुन्हा निवडूण द्यावे असे आवाहन युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास यांनी केले.

तालुक्यातील पेठसांगवी येथे सोमवारी (दि.29) युवक काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळावा व धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत, महाराष्ट्राचे प्रभारी उदय भानू (जमुकाश्मीर), संयोजक तथा युवक काँग्रेसचे महासचिव महेश देशमुख, प्रदेश चिटणीस अभिजित चव्हाण, अमर खानापुरे, जयप्रकाश निंबाळकर, हनुमंत सांगवीकर, जेष्ठ नेते बाबा पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार, शिवसेनेचे प्रा. डॉ. संजय कांबळे, रणधीर पवार, अशोकराजे सरवदे, बाबुराव शहापुरे, बसवराज वरनाळे, रज्जाक अत्तार, विजयकुमार नागणे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अँड. सुभाष राजोळे, विजयकुमार सोनवणे, एस. के. सुरवसे, नानाराव भोसले, विजय दळगडे, मधुकर यादव, अभिषेक औरादे, सय्यद खलील, अँड. एस. पी. इनामदार आदींची उपस्थिती होती.

Exit mobile version