अधिकारी,कर्मचार्यांकडून नागरिकांना नाहक त्रास
चौकशीसाठी गेलेल्या कृषीवल प्रतिनिधीवरच गुन्हा
पेण | वार्ताहर |
पेणमधील भूमी अभिलेख कार्यालयाचा अनागोंदी कारभार सुरु असून,येथे काम करणार्या अधिकारी,कर्मचार्यांकडून सर्वसामान्यांना नाहक त्रास दिला जात असल्याचे निदर्शनास येत आहे. पगार सरकारचा, मात्र कामे पैसेवाल्यांचीच होतात. सर्वसामान्यांना या कार्यालयात मान सन्मानाची वागणूक मिळत नाही. मात्र विचारणा करण्यासाठी जाण्यार्याचा अपमान नक्की होतो, असाच अनुभव सर्व सामान्यांना येत आहे. याबाबतची माहिती बाहेर येऊ नये म्हणून कृषीवलचे प्रतिनिधी संतोष पाटील यांच्याविरुद्धच गुन्हा दाखल करण्यात आल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
याबाबत विचारणा केली असता अधिकारी वर्गाकडून गुन्हे नोंदविण्याची धमकी देखील दिली जाते. याबाबत वरिष्ठ अधिकार्यांनी कार्यालयीन कामकाजात सुधारणा करणे गरजेचे आहे,अन्थथा अन्यथा सर्वसामान्यांनी जर चुकीचे पाऊस उचललेल तर त्याची सर्वस्वी जबाबदारी कार्यालयातील कर्मचार्यांची व वरिष्ठ अधिकार्यांची असेल.
प्रस्तुत प्रतिनिधी भूमी अभिलेख कार्यालयास भेट दिली असता संपूर्ण कार्यालयात एक शिपाई, दोन डाटा ऑपरेटर व एक सर्व्हेअर आढळून आले. ज्या कार्यालयात डाटा ऑपरेटर वगळता 13 पद आहेत त्या कार्यालयात कोणी अधिकारी नसणे ही बाब किती योग्य आहे? याचा विचार कार्यालयीन प्रमुखांनी करणे गरजेचे आहे.
कार्यालयाचे प्रमुख उपअधिक्षक भूमी अभिलेख सुजित जाधव यांना दुरध्वनी वरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींचा फोन घेतला नाही. तर कार्यालयात असलेल्या नाईक या महिला शिपायांनी उलट सुलट उत्तरे देत पन्नास टक्केच कर्मचारी हजर असतात, कर्मचारी कमी आहेत, अशी उर्मटपणे उत्तरे दिली. महत्वाची बाब म्हणजे या महिला शिपायाकडे कोणीही याबाबत विचारणा केली नव्हती, परंतु मुद्दामच कार्यालयात होत असलेली मनमानी लपविण्यासाठी या महिला शिपायाने मध्येच हुज्जत घातली. कार्यालयीन कर्मचार्यांच्या हालचाल रजिस्टर विषयी चौकशी केली असता त्याबाबतही व्यवस्थित उत्तर देता आले नाही.
सर्वसामान्यांना चकरा
तालुक्यातील सर्वात बेजबाबदार कार्यालय म्हणून भूमी अभिलेख कार्यालयाकडे पाहिले जाते. या कार्यालयात ज्याची ओळख, त्याचे काम पहिले केले जाते आणि सर्व सामान्यांना फक्त फेर्या आणि फेर्याच माराव्या लागतात. त्यामुळे सर्व सामान्य जनता त्रस्त झाली आहे. जागेची मोजणी व्हावी म्हणून कित्येक जणांनी सहा-सहा महिने अगोदर पैसे भरून ठेवले आहेत, मात्र त्यांची आजही मोजणी होत नाही. परंतु काही जण दोन दिवस अगोदर पैसे भरतात, लगेच त्यांच्या मोजणीची नोटीसी निघल्या जातात. मग सर्वसामान्यांना सहा-सहा महिने फेर्या का माराव्या लागतात?
या कार्यालयातून गटस्कीम हद्द कायम करणे, मोजणी, गटबुक नकाशे, आकार फोड, पोट हिस्सा आदींसह अनेक कामे होतात. परंतु ही कामे करण्यासाठी पहिल्यांदा लक्ष्मी दर्शन घडवावे लागते. तसेच हे लक्ष्मी दर्शन घडवण्यासाठी ज्या कार्यालयातील अधिकार्यांनी काही विशिष्ट व्यक्ती नेमलेले आहेत, तेच फक्त अधिकार्यांच्या वतीने लक्ष्मी संपादन करतात. एकंदरीत म्हणजे या कार्यालयात सर्वत्र बजबजपुरी माजलेली आहे. साधारण या कार्यालयात 1200 च्या आसपास मोजणी प्रकरणे प्रलंबित आहेत. या प्रकरणाबाबत विचारणा करण्यासाठी गेले असता मुद्दामहुन कार्यालयाचे बिंग
फुटू नये म्हणून कृषीवरचे प्रतिनिधी संतोष पाटील यांच्या विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. असा गुन्हा नोंद करणे म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणे हाच अर्थ निघतो.
संतोष पाटील निर्भिड पत्रकार,लोकप्रतिनिधी
भूमी अभिलेख कार्यालयालाने सूडबुद्धीने ज्या पत्रकारांवर गुन्हा दाखल केला आहे.ते कृषीवलचे प्रतिनिधी संतोष पाटील हे पत्रकारी क्षेत्रामध्ये गेली 16 वर्षे निस्वार्थीपणे काम केले असून आजपर्यंत दोन ते तीन वेळा त्यावर झालेले हल्ले तसेच बातमी संदर्भात केलेले अबु्र नुकसानीचे दावे हे सर्व पाहता संतोष पाटील हे भ्रष्टाचाराविरूध्द आपल्या लेखनीने सर्वांची पोलखोल करत आहेत. त्यामुळेच त्यांना चुकीच्या गुन्हयात अडकविण्यावा हा प्रयत्न असावा. महत्वाची बाब म्हणजे ते स्वतः एक जबाबदार लोकप्रतिनिधी आहेत. उच्चविद्याविभूषित असलेल्या संतोष पाटील यांना चांगले समाजभान आहे.त्यामुळ अशी व्यक्ती महिलांचा अपमान होईल अशी वागूच कशी शकेल? याचाही विचार करणे गरजेचे आहे. गुन्हा नोंद झाला म्हणजे तो आरोपी गुन्हेगार, अपराधी असे संबोधले जाते, हे चुकिचे आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून सध्या संतोष पाटील यांच्या बदनामीचे षडयंत्र सुरू असून,आपला कायदा व न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याचा दावा संतोष पाटील यांनी केला आहे.