| चिपळूण । वार्ताहर ।
गणेशोत्सवासाठी चिपळूण आगार सज्ज झाला आहे. मुंबई परिसरात राहणार्या चाकरमान्यांना गावी आणण्यासाठी चिपळूण आगारातून 160 जादा गाड्यांची व्यवस्था केली आहे. त्याशिवाय दररोज 80 गाड्या नियमित धावणार आहेत. मुंबई, बोरिवली, ठाणे, कल्याण, खार आदी ठिकाणी नोकरीनिमित्त असलेल्या चाकरमान्यांना गावी सुरक्षित पोचता यावे तसेच परतीच्या मार्गावरील भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी एसटीने व्यवस्था केली आहे.