रसायनी | वार्ताहर |
रसायनी परिसरातील जवळपास 753 गणपती आणि 197 गौराईंना भक्तिमय वातावरणात भावपूर्ण निरोप देण्यात आला.पाच दिवसाच्या आनंदीत वास्तव्य,पाहुणचार घेऊन गौरी गणपती पुन्हा आपल्या गावी गेल्याने अनेक भक्तगण विशेषतः लहान मुले व महिलांच्या डोळ्यात अश्रू आल्याचे दिसून आले. रसायनी परिसरातील रिस पुल,कांबे नदी,मोहोपाडा तलाव, तळेगाव वाडी घाट, पाताळगंगा नदी,रसेश्वर मंदिर घाट,वावेघर,गुळसुंदे घाट,कासप आदी ठिकाणी गौरी गणपतींना जड अंतःकरणाने भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी रसायनी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली विसर्जन स्थळी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.