| कोर्लई | वार्ताहर |
अदानी पोर्टच्या आगरदांडा येथे होणार्या रेल्वे भूसंपादन मोजणीला येथील स्थानिक शेतकर्यांनी तीव्र विरोध केला आहे. येथून जाणारा रेल्वे मार्ग हा गावाबाहेरील महामार्गाच्या बाजूने नेण्यात यावा, तसेच सातबार्यावरील पेन्सिल शेरा रद्द करण्यात यावा आदी मागण्यांसह विरोध दर्शवित मोजणी होऊ दिली नाही.
महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख (मुरुड-जंजिरा) विभागाने येथील शेतकर्यांना बुधवार, (दि.10) एप्रिल आगरदांडा येथे रेल्वे भूसंपादन मोजणीसाठी संयुक्त नोटीस बजावण्यात आली होती. त्यानुसार सकाळी 9.30 वाजता प्रत्यक्ष जागेवर हजर राहण्याचे सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे येथील जमीन मोजणीला संबंधित शेतकर्यांनी उपस्थित राहून सदरचा रेल्वे मार्ग हा गावाबाहेरील महामार्गापासून नेण्यात यावा तसेच सातबार्यावरील पेन्सिल शेरा रद्द करण्यात यावा, अशी मागणी करत मोजणी होऊ दिली नाही.
यावेळी मुरुडच्या भूमी अभिलेखचे निमतानदार एम.पी. पोकळे, सहकारी तसेच रुषिकांत डोंगरीकर, यूसुफ अर्जबेगी, संतोष पाटील, आशिष हेदूलकर, अर्पेश चिंदरकर, शब्बीर काझी, नजीर खतीब, तहसिन बशीर फकी, इमुद्दीन कादिरी, अहीर, मुब्बशिर खतीब शेतकरी उपस्थित होते.