माथेरान | वार्ताहर |
मागील पंधरा दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानावर आपल्याच हक्काचे रखडलेले निवृत्तिवेतन स्वतःच्या हयातीत मिळावे या मागणीसाठी साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे.
साखळी उपोषणाचा पंधरावा दिवस उजाडला आहे तरीसुद्धा अद्यापही शासनाला या अनुसूचित जमातीच्या महत्वपूर्ण मागणी संदर्भात काही एक स्वारस्य दिसत नाही.ज्या ज्या व्यक्ती या स्थळी आपले घटनेने दिलेले मूलभूत अधिकार आणि हक्क मिळावे यासाठी बारीबारीने उपोषणाला बसून आपल्या कैफियती मांडत आहेत.यामध्ये महिलांना ज्या ज्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे त्या व्यथा ऐकून मन सुन्न होऊन जात आहे. आफ्रोहफच्या साखळी उपोषणाच्या निमित्ताने सेवानिवृत्त शिक्षिका वासंती वेल्हाळ यांनी मांडली आपली व्यथा मांडली.
उपोषणाच्या बाराव्या दिवशी गजानन टिवळेकर,पांडुरंग यज्ञेश्वर,चंद्रनाथ रामजी हे रायगड जिल्ह्यातील सेवानिवृत्त कर्मचारी आझाद मैदानावर उपोषणाला बसले होते.
साखळी उपोषणासाठी ठाणे जिल्हाशाखेचे अध्यक्ष दयानंद,महिला आघाडीच्या प्रियाताई खापरे,राज्य कार्यकारिणी सदस्य नरेश खापरे कोळी,उपाध्यक्ष अर्जून मेस्त्री,नरेंद्र भिवापूरकर,घनश्याम हेडाऊ,ऑफ्रोह ठाणे जिल्हा सह सचिव पांडुरंग नंदनवार, सदस्य रविन्द्र निमगावकर व इतर पदाधिकारी यासाठी प्रयत्नशील आहेत.