ट्रकचा व कारचा भीषण अपघात; चौघांचा मृत्यू

| उत्‍तर प्रदेश | वृत्‍तसंस्था |

अर्टिगा गाडीमधून आपापल्या घरी परतत असताना हा अपघात झाला आहे. गाडीचा पुरता चक्काचूर झाला आहे. अपघात एवढा भीषण होता की, कारचे काही भाग कापून मृतदेह बाहेर काढण्यात आले.

उत्तर प्रदेशातील इटावा येथे इकदिल पोलीस स्टेशन हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावर सकाळी 7 वाजता ही घटना घडली आहे. सर्वजण अर्टिगा गाडीमधून आपापल्या घरी परतत असताना त्यांची गाडी वाटेत उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. अपघात एवढा भीषण होता की, अपघातात एक अख्खं कुटुंब जागीच ठार झाल आहे.ड्रायव्हरला डुलकी लागल्यानं हा अपघात झाला. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत. मृत व्यक्ती आणि गंभीर जखमी एकाच कुटुंबातील आहेत. गंभीर जखमी असल्यानं एक महिला आणि एका तरुणीला स्थानिक जिल्हा रुग्णालयातून सैफई वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं आहे.

Exit mobile version