प्रकाश आंबेडकरांवर गुन्हा दाखल करुन अटक करा

नारायण राणेंनी केली पत्रकार परिषदेत मागणी
| मुंबई | वृत्तसंस्था |
वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर असो किंवा इतर कुणीही असो, जे कोणी दंगलीविषयी बोलत असतील, त्याची पोलिसांनी दखल घ्यावी, त्यांची चौकशी करायला हवी. आंबेडकर यांच्यावर एफआयआर दाखल करून, त्यांना अटक व्हायला पाहिजे. त्यांना अटक करून दंगलीचा आधार काय आहे याची माहिती घ्यायला पाहिजे. राजकीयदृष्ट्या संपलेले लोक बोलत आहेत.त्यांनी आता घरी बसायला हवं अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली.

मनोज जरांगे लहान आहेत. त्यांनी अभ्यास करावा. आरक्षण कसं मिळत हे त्यांना माहिती नाही. जातीचा, धर्माचा, संविधानातील तरतुदींचा त्यांना काहीही अभ्यास नाही. त्यामुळे त्यांनी आधी अभ्यास करावा. मराठा कधीही ओबीसीतून आरक्षण घेणार नाही, असं म्हणत राणे यांनी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावरही टीका केली.

Exit mobile version