| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना सोमवारी (दि.26) रांचीत पार पडला. भारताने चौथ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी इंग्लंडने दिलेले 192 धावांचे आव्हान 5 विकेट्सच्या मोबदल्यात पार करत मालिका खिशात टाकली. भारताने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडी मिळवली आहे.
रोहित शर्माच्या टीम इंडियाने रांची कसोटीतही तिरंगा फडकावून, इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका खिशात टाकली. सलामीवीर शुभमन गिलचं संयमी अर्धशतक आणि ध्रुव जुरेलची पुन्हा चमकदार खेळीमुळे, भारताने चौथ्या कसोटीत इंग्लंडवर 5 विकेट्स राखून विजय मिळवला. चौथ्या कसोटीत ब्रिटिशांनी भारतीय क्रिकेट संघासमोर 192 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. साहेबांचं लक्ष्य स्वीकारून मैदानात उतरलेल्या टीम इंडियानं तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत एकही विकेट न गमावता 40 धावा केल्या होत्या. मात्र, आज आघाडीची पडझड झाल्यानंतर टीम इंडिया संकटात आली होती. पण भारतीय संघाच्या या विजयात शुबमन गिल आणि ध्रुव जुरेलने नाबाद 72 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करून मोलाचे योगदान दिले.